📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 21, 2026
काय चाललयं अवतीभवती

गोवा मराठी अकादमीचे साहित्य पुरस्कार जाहीर

Literary Award of Goa Marathi Academy announced

पणजी : गोमंतकीय मराठी साहित्यिकांना प्रेरणा देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी गोवा मराठी अकादमीने विविध साहित्य पुरस्कारांची योजना जाहीर केली होती. पुरस्कारांसाठी गोमंतकीय साहित्यिकांकडून एकूण ४७ पुस्तके आली होती. यातून परिक्षकांनी साहित्यकृतींची निवड केली असून साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

पुरस्कारप्राप्त साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यकृतींची नावे अशी…

  • अरूण नाईक – “वाघकोळंब कथासंग्रह – वि. स. सुखटणकर पुरस्कार,
  • भावार्थ मांद्रेकर – ‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ चरित्र – अ. का. प्रियोळकर पुरस्कार,
  • गजानन देसाई – ‘दवबिंदू’ ललित लेखसंग्रह – बा. भ. बोरकर पुरस्कार,
  • दीपक प्रभुदेसाई – ‘लवलाहो’ कविता संग्रह – शंकर रामाणी पुरस्कार,
  • संदीप मणेरीकर – ‘संगीत सूरसाधक’ नाटकविष्णू वाघ पुरस्कार.
  • डॉ. नीता तोरणे – चित्रा क्षिरसागर ‘गोमंतकीय स्त्रीलिखित मराठी कविता’ संपादन, संकलन – डॉ. एस. एस. नाडकर्णी पुरस्कार
  • प्राची जोशी – ‘समकालीन कांदबरीकारांचा तौलनिक अभ्यास’ वाङ्मयीन संशोधन – बा. द. सातोस्कर पुरस्कार,
  • अजित पैंगीणकर – ‘गावातील माणसांच्या कथा’ – पं. महादेवशास्त्री जोशी पुरस्कार.

कणकवली येथील प्रा. मोहन कुंभार आणि गोमंतकातील ज्येष्ठ मराठी साहित्यिक नारायण महाले यांनी पुरस्कार निवडीसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले. पुरस्कार प्राप्त सर्व गोमंतकीय साहित्यिकांना प्रत्येकी रु.१०,000 आणि सन्मानचिन्ह देण्यात येईल. दि. २२ रोजी दुपारी ३ वाजता वास्को येथील रवींद्र भवनात आयोजित केलेल्या वर्धापनदिन समारंभात सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

Related posts

मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे पुरस्कारासाठी संतवाङ्मयावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सागरी खाद्यान्य उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या चार वर्षांत 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ

पुस्तकांचे गाव प्रमाणे इतिहास साक्षर गाव ही संकल्पना राबविण्याची गरज – प्रा. डॉ. राजा दीक्षित Dr Raja Dixit Historical Literacy Concept

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!