📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 30, 2026
मुक्त संवाद

आमचा अशोक इकडे आलाय का ?

Actor Bhalchandra Kulkarni memory

आमचा अशोक इकडे आलाय का ?

या एका डायलॉग ने त्याकाळी धूम धडाका चित्रपटात खऱ्या अर्थाने रंगत आणली होती अर्थात हा डायलॉग ज्यांच्या तोंडून बाहेर पडला ते होते ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी सर. आज सकाळी त्यांचे निधन झाले आणि काही क्षणातच धुमधडाका चित्रपटातील त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहीली.

– युवराज पाटील,
शिवाजीपेठ, कोल्हापूर

स्पष्टवक्तेपणा, डायलॉग इतक्याच ताकतीने म्हणण्याची असलेले हातोटी ही कुलकर्णी सरांची वैशिष्ट्ये होती. मध्यंतरी दैनिक सकाळ कार्यालयात ते आले असता त्यांना पाहताच मी अशोक इकडे आला होता का हा डायलॉग म्हटला आणि सर म्हणाले अजून तुझ्या लक्षात आहे का हा डायलॉग ? 

अधून मधून आयडीबीआय बँकेत त्यांची भेट व्हायची. जयप्रभा स्टुडिओच्या विरोधातील आंदोलन असो अथवा छत्रपती शिवाजी चौकातील सुशोभीकरणाचा विषय असो त्यांचा सक्रिय सहभाग यात दिसून यायचा. लता मंगेशकर या महान आहेत याबाबत आपले दुमत नाही पण जयप्रभा स्टुडिओ बाबत जी भूमिका घेतली त्याविरोधात कुलकर्णी सर ठाम राहिले. धूम धडाका चित्रपटातील आमचा अशोक इकडे आलाय का अथवा या चित्रपटाच्या शेवटी तुम्ही जरा गप्प बसा ओ हा डायलॉग ही तितकाच लोकप्रिय ठरला. 

थरथराट चित्रपटात संपादकांची छोटेखानी भूमिका ही चर्चेची ठरली. लक्ष्मीकांत बेर्डे वार्ताहर आणि कुलकर्णी सर संपादक असा हा गमतीचा खेळ होता. या चित्रपटाने लोकांना पोट धरून हसवण्यास भाग पाडले. विनोदी भूमिका असो अथवा एखाद्या चित्रपटातील भावनिक क्षण त्याला न्याय देण्याचे काम कुलकर्णी सरांनी केले. माहेरची साडी या चित्रपटात अलका कुबल यांच्या सासऱ्याची भूमिका त्यांनी तितक्याच ताकतीने पार पडली. एखाद्या सासऱ्याचे मन किती हळवं असतं ते त्यांनी भूमिकेतून दाखवून दिलं. पडद्यावरची भूमिका असो अथवा खऱ्या आयुष्यातील जगणं असो यामध्ये भेदाभेद न करता नेहमी प्रॅक्टिकल राहण्याच तत्व त्यांनी कायम जपलं. अनेक चित्रपटातून ते लोकप्रिय झाले तरीही एक माणूस म्हणून ते सदैव स्मरणात राहील. आमचा अशोक इकडे आलाय का ? या डायलॉग चे ही असेच आहे. 

Related posts

गारगोटीचा स्वातंत्र्य संग्राम

पायरीच्या दगडाचे रहस्य…

कोरोना संकट

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!