📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 17, 2026
काय चाललयं अवतीभवती

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

Shrishabda Kavya Puraskar

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी आवाहन

कै.सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृति प्रित्यर्थ गेली काही वर्षे कवितासंग्रहाला ‘श्रीशब्द ‘ पुरस्कार दिले जातात. याहीवर्षी असे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 1100 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे आहे. स्फूर्ती साहित्य संघाच्यावतीने नेज (ता. हातकणंगले) येथे समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

यासाठी १ जानेवारी, २०२२ ते ३१ डिसेंबर,२०२२ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रहाची एक प्रत कवींनी अथवा प्रकाशकांनी १० एप्रिल २०२३ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले आहे.

यंदा दोन्ही वर्षाचे पुरस्कार एकत्र दिले जाणार आहेत. गतवर्षीचा निकाल यापूर्वीच जाहीर झाला आहे. फक्त २०२२ सालाची पुस्तके पाठवावीत. पुस्तके कवी चंद्रकांत पोतदार, मु. पो. मजरे कारवे, ता. चंदगड, जि.कोल्हापूर 416507. मोबाईल – 9423286479 या पत्त्यावर १० एप्रिलपूर्वी पाठवावीत.

Related posts

2027 पर्यंत 47 नवीन राष्ट्रीय जलमार्ग

कवी उदय जाधव यांची कविता व्यवस्थेलाच प्रश्न विचारते – प्रेमानंद गज्वी

सोशल मीडियामुळे मराठी कविता उथळ होत गेली

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406