📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 16, 2026
काय चाललयं अवतीभवती

मुलखावेगळ्या स्त्रियांचे जिचं तिचं आकाश प्रकाशित

Book launch event of Jich Tich Aakash by Chitra Mehendale in Mumbai with prominent guests

मुंबई – अमेरिकेत आणि भारतात विविध क्षेत्रात मुलखावेगळी कामगिरी करीत असलेल्या स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवन कथा असणार्‍या अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे ह्यांच्या ” जिचं तिचं आकाश ” ह्या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्ले ( पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या सभागृहात झाले.

या प्रकाशन सोहोळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ न्यायमूर्ती श्रीमती बागेश्री पारख,अभिनेत्री सुप्रिया सचिन पिळगावकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, नगरसेविका श्रीमती अंजली सामंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अभिनेत्री रजनी वेलणकर ह्यांनी भूषविले. अलका भुजबळ ह्यांनी बहारदारपणे सूत्रसंचालन करून कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली. ह्यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांची समयोचित भाषणे झाली. तर श्रीमती रजनी वेलणकर ह्यांनी पुस्तकातील काही कथा नायिकांच्या जीवनाचा संघर्ष उलगडून सांगताना, अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक आजच्या युवक युवतींनी वाचलेच पाहिजे असे, आवर्जून सांगितले.

प्रारंभी लेखिका चित्रा मेहेंदळे यांनी सर्वांचे स्वागत करून पुस्तकामागील प्रेरणा, पुस्तकाची जडणघडण ह्याबद्दल विस्ताराने सांगितले. देवेंद्र भुजबळ यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर आणि साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कथा नायिका, लेखिका, प्रकाशिका, कार्यक्रमाच्या अध्यक्षा ह्या सर्व महिलाच आहेत. ह्या पुस्तकाची निर्मिती ग्रंथाली ने केली असून न्यूज स्टोरी टुडेने प्रकाशन केले आहे.

Related posts

कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी

अन्नदात्याच्या स्वयंपूर्णतेचाही व्हावा विचार !

…अन् एन. डी. राजू शेट्टींना म्हणाले, आंदोलन कसं कायं चाललयं

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406