📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 12, 2026
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मनीषा पाटील-हरोलीकर यांचा कवितासंग्रह पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना’ या गाजलेल्या कवितासंग्रहाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात समावेश.

पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमासाठी कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना ’ या कवितासंग्रहाची निवड झाली आहे. ‘साहित्याचा प्रकारात्मक अभ्यास: कविता ’ या अभ्यासपत्रिकेमध्ये संग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.

मनीषा पाटील-हरोलीकर यांचे ‘पायवाटेवरील दिवे ’, ‘मातीविश्व ’, ‘नाती वांझ होताना ’ हे तीन कवितासंग्रह, ‘ विचारमंथन ’ हा भाषणसंग्रह प्रकाशित आहे. ‘आभाळाच्या गावी ’ हा बालकवितासंग्रह प्रकाशनाच्या मार्गांवर आहे.‘नाती वांझ होताना ’ या कवितासंग्रहास अनेक राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आहेत. भि. ग. रोहमारे पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा शैला सायनाकर पुरस्कार, नामदेव ढसाळ पुरस्कार, कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार अशा पुरस्कारांनी ह्या कवितासंग्रहाचा गौरव करण्यात आला आहे.

कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर या श्री महालक्ष्मी हायस्कुल देशिंग हरोली येथे कार्यरत आहेत. राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्या त्या सदस्य आहेत. ‘आमचे जगणे आमची कविता’ या गंभीर कवितेच्या ग्रुपच्या कार्यक्रमांमधून त्यांची कविता महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठांमध्ये पोहोचली आहे.या कवितासंग्रहाचा हिंदी अनुवाद ‘ रिश्तो का बंजर होना ’ रचना यांनी केला आहे. त्या अग्रणी साहित्य प्रतिष्ठानच्या कार्यवाह असून अभिव्यक्ती साहित्य प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत.

स्त्रियांची घुसमट, या घुसमटीतून निर्माण झालेले प्रश्न आणि मानवी नात्यांचा संपलेला ओलावा यावर ही कविता भाष्य करते. नात्यांच्या दुभंगलेपणाच्या प्रक्रियेतून जगण्यात आलेले कोरडेपण, वाढू लागलेले अंतर, हद्दपार झालेला जिव्हाळा आणि जीवनाला व्यापून राहिलेली भयग्रस्थता हे आजचे वास्तव त्यांच्या कवितेचे आस्थाकेंद्र आहे.

Related posts

महर्षी शिंदेंना टिळकांनी या प्रश्नावर स्वाक्षरी देणे टाळले – डॉ. जनार्दन वाघमारे

आंतरविद्याशाखीय अभ्यासातून समग्रतेचा शोध शक्य – डॉ. दिलीप चव्हाण

डॉ. तारा भवाळकर या प्रागतिक स्त्रीवादी संशोधक, साहित्यिक

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406