📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 12, 2026
काय चाललयं अवतीभवती

जागतिक पातळीवर लोककलांच्या वाट्याला दुर्दैवी वास्तव येतं – प्रा.सुरेश द्वादशीवार

संजोरी ग्रंथाचे प्रकाशन सोहळा – झाडी बोली लोककलेचा गौरव करताना प्रमुख पाहुणे

रशियातील लोकनृत्य पाहायला रशियन नसतात, बाहेरचे पर्यटक असतात. मी नंदुरबार पासून देश, विदेशातील गडचिरोलीच्या सिरोंच्यापर्यंतचे आदिवासी पाहिले. ते गरिब, दरिद्री, कष्टकरी आहेत पण ते दुःखी, खिन्न, निराश नाहीत. त्यांच्या पोरांच्या तोंडावर माशा बसतात पण ते हसतात.

प्रा.सुरेश द्वादशीवार

डॉ. धनराज खानोरकरांच्या ‘ संजोरी ‘ ग्रंथाचे प्रकाशन

चंद्रपूर – ‘ संजोरी ‘पुस्तकात राहू नये ती लोकांच्या मनात जावी. आपण या लोककलांपासून दूर चाललो आहोत म्हणून जागतिक पातळीवर लोककलांच्या वाट्याला दुर्दैव येतं.” असे बहूमूल्य विवेचन ज्येष्ठ संपादक व प्रसिद्ध कादंबरीकार प्रा.सुरेश द्वादशीवारांनी केले.

ते डॉ. धनराज खानोरकर लिखित झाडी लोककला, लोकसंस्कृतीच्या ‘संजोरी’ ग्रंथ प्रकाशनानिमित्त श्रमिक पत्रकार संघ भवनात बोलत होते. ‘संजोरी’चे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम चंद्रपूर जिल्हा झाडी बोली साहित्य मंडळाने आयोजित केला होता.

चांगले लेख प्रा. खानोरकरांनी ‘ संजोरी’त लिहिलेत अन् ते खास विनोदी शैलीत. ‘संजोरी ‘ म्हणजे धानचुरन्याचे खळ्यावरील शेवटच्या मोळ्याचे मटनाचे जेवन. या देशातले ८४ टक्के हिंदू मांसाहारी आहेत.’ संजोरी ‘ याही दृष्टीने महत्त्वाची आहे. जे इतिहास विसरतात त्याला भविष्य असत नाही. ग्रामीण, आदिवासी, झाडीपट्टीचे सौंदर्य ‘ संजोरी ‘त आहे. येथील ‘ झाडी माणसाची ‘मोह’माया ‘हा अत्यंत सुंदर लेख. कधीतरी संचिताकडे आपण लक्ष दिले पाहिजे, ते यांनी दिले. तिखट ही चव आहे. हिरोती हा त्याचा खरा शब्द आहे. संवाद हे साध्य आहे, भाषा माध्यम आहे, म्हणून संवाद व्हावा.

प्रा.सुरेश द्वादशीवार

विचारपिठावर भाष्यकार म्हणून नागपूरचे प्रसिद्ध लेखक व समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. श्याम मोहरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर व लेखक डॉ. धनराज खानोरकर, कवी अरुण झगडकर उपस्थित होते.

‘संजोरी ‘हा प्राध्यापकांचा संशोधन पेपर नव्हे ते झाडीचे सांस्कृतिक संचित आहे. हे त्यांनी एक पुस्तकरुपाने दस्तऐवज म्हणून आपल्या सामोर आणलं आहे. झाडीच्या लोककलांबद्दलचा असा पुस्तक पहिल्यांदाच आला. ते यमक , श्लेष वापरतात व स्वत:च नव्या म्हणींना जन्म देतात. हे प्रा.खानोरकरांचे काम बहुमूल्य असे आहे.

डॉ. प्रमोद मुनघाटे

तर डॉ. मोहरकरांनी, डॉ. खानोरकरांनी स्वतःची खास शैली घडवली असून बोलणं, लिहिणं, वागणं एका तालात आहे. ‘ संजोरी ‘ वाचतांना याची पानोपानी प्रचिती येते, असे विचार मांडले.

प्रास्ताविकातून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकरांनी झाडीबोलीचा इतिहास कथन केला. डाॅ. खानोरकरांनी ‘ संजोरी ‘ जन्माची कथा सांगीतली. संचालन चंद्रपूर झाडीबोली मंडळाचे अध्यक्ष कवी अरुण झगडकर यांनी तर आभार कवी प्रशांत भंडारे यांनी मानले. कार्यक्रमाला अनेक कवी, लेखक, विचारवंत श्रोते उपस्थित होते.

संजोरी लोककला : झाडी जनजीवनाचा सजीव आविष्कार

‘संजोरी’ ही विदर्भाच्या विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली भागात प्रचलित असलेली झाडी बोलीतील एक महत्त्वाची लोककला आहे. ही कला केवळ मनोरंजनाचे साधन नसून स्थानिक जनतेच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक भावविश्वाचे प्रतिबिंब आहे.

संजोरी ही सामवेदाच्या पारंपरिक लयीत गायली जाणारी कथाकथनप्रधान लोककला आहे. यात स्त्रीपुरुष पात्रे गात-नाचत प्राचीन लोककथा, पौराणिक प्रसंग किंवा सामाजिक विषय मांडतात. तासाभराच्या या सादरीकरणात संवाद, गीतं, नृत्य आणि नाट्य यांचा सुरेख संगम दिसतो.

या कलेतून वनवासी समाजाच्या जीवनशैलीचे, त्यांच्या देवदेवतांचे, सण-उत्सवांचे, तसेच त्यांच्या संघर्षांचे चित्रण होते. ही कला निसर्गाशी आणि भूमीशी नातं सांगते. यामध्ये प्रामुख्याने कुसमाटी, गोंड, कोरकू, परधान, कोळी यांसारख्या जमातींचा सहभाग असतो.

संजोरीत काठी, ढोल, झांज, ताशा यांसारखी पारंपरिक वाद्यं वापरली जातात. कलाकारांचे पोशाख, वेशभूषा व रंगभरणही अत्यंत आकर्षक असतो. ही कला वर्तमान समाजात उपेक्षित झाली असली, तरी ती लोकसाहित्याचा अमूल्य ठेवा आहे.

डॉ. धनराज खानोरकर यांचा ‘संजोरी’ हा ग्रंथ या लोककलेचा अभ्यास, दस्तऐवजीकरण व जतन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. झाडी बोलीतील या पारंपरिक कलारुपाला साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिष्ठान मिळवून देणे ही काळाची गरज आहे.

संजोरी म्हणजे आदिवासी संस्कृतीचा आत्मा — तो जपणं म्हणजे आपल्या सांस्कृतिक मुळाशी जोडून राहणं!

Related posts

अभिजन बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो – अजय कांडर

हा तर ग्रामीण कथेचा सन्मान

महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406