📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 12, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नैऋत्य गेला ईशान्य मान्सूनचे आगमन

नैऋत्य मान्सून देशातून निवृत्त होताच ईशान्य मान्सून तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशात दाखल; महाराष्ट्रात रब्बी पिकांना लाभदायक किरकोळ पावसाची शक्यता व्यक्त.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

 नैऋत्य मान्सून गेला-

                   देशात २४ मे ला दाखल झालेला नैऋत्य मान्सून देशात १४६ दिवस कार्यरत राहून त्याच्या सरासरी निर्गमन तारखेच्या एक दिवस उशिरा म्हणजे आज गुरुवार दि. १६ ऑक्टोबर ला देशातून बाहेर पडला.

ईशान्य मान्सून चे आगमन-

               नैऋत्य मान्सून देशातून जाताच ईशान्य मान्सूनने आज देशातील दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, माही पॉंडिचेरी, करायकल, सीमांध्र, रायलसीमा व दक्षिण कर्नाटक राज्यात त्याने आपले आगमन प्रस्थापित केले आहे. गेल्या २४ तासात तामिळनाडू व लगतच्या परिसरात मान्सून ने जोरदार हजेरी लावली.

महाराष्ट्रातील पाऊस-

                 विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यात पावसाच्या चौथ्या आवर्तनातून शनिवार दि. १८ ते बुधवार दि. २२ ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी रब्बीला लाभदायक ठरेल अश्या किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही आज १६ तारखेला मराठवाड्यात मध्यम पावसाची शक्यता अधिक जाणवते.

ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यातील पाऊस-

                   शनिवार दि. २५ ऑक्टोबर दरम्यान आग्नेय बंगाल उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्मिती व त्याचे पश्चिमेकडे मार्गक्रमणातून संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या जिल्ह्यात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
                  

Related posts

पीएसएलमध्ये साखर उद्योगाचा समावेश केल्यास अनेक फायदे

सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित करा उपाययोजना

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406