May 2, 2026
Poet Sagar Jadhav holding his poetry book 'Mati Magte Painkiller' after winning the Vitthal Wagh Literature Award
Home » लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर

नाशिक – लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार चांदवड जि. नाशिक येथील कवी सागर जाधव यांच्या माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष कवी लक्ष्मण महाडिक यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील नामवंत कवी संदीप जगताप व शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या वतीने उत्कृष्ट कवितासंग्रहासाठी लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. यंदाच्यावर्षी या पुरस्कारासाठी राज्यभरातून १७५ कवितासंग्रह आले होते. मॅग्नस फार्म येथे संपन्न झालेल्या निवड समितीच्या अंतिम बैठकीत या पुरस्कारासाठी सागर जाधव यांच्या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. यावेळी मॅग्नस फार्मचे संचालक लक्ष्मण सावळकर, कवी प्रा. संदीप जगताप, प्रा. शशिकांत घुटे उपस्थित होते.

दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. निवड समितीमार्फत या पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड केली जाते. कवी लक्ष्मण महाडिक यांच्या निवड समितीने यावर्षी या पुरस्काराची निवड केली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अंतिम फेरीमध्ये मोठी चूरस निर्माण झाली होती. परंतु नव्या काळाचे खेड्यातील प्रश्न घेऊन, नव्या प्रतिमा असलेली कविता माती मागते पेनकिलर या कविता संग्रहात बघायला मिळते. तंत्रयंत्रकाळातील कविता या संग्रहात आली आहे. शेतकऱ्यापुढे उभे राहिले नवे प्रश्न या कवितेने सशक्त पणे मांडले आहे. म्हणून हा कविता संग्रह या पुरस्कारासाठी पात्र ठरला. असे निवड समितीने सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते लवकरच या पुरस्काराचे वितरण मॅग्नस फार्म येथे होणार आहे. सागर जाधव यांना महाराष्ट्रातील अतिशय सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

सोयाबिन, कापसाला भाव का मिळत नाही याचे अर्थशास्त्र समजून घेण्याची गरज – विजय जावंधिया

कीटकनाशकांपासून शेतकऱ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी सूट

मोदी सरकारच्या ‘बियाणे सार्वभौमत्वाच्या आत्मसमर्पणा’चा किसान सभेकडून तीव्र निषेध

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!