📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 13, 2026
कविता

तर जगणं होत नाही जड …..

Sandeep Jagtap Poem on Tourism of Farmer

बाई..
आमच्या कडं नाही
ज्यात हॉल, बेडरूम, किचन, डायनींग
अस्सं सुसज्ज घर …

आमच्या कडे दगडाला कोंब फुटल
अस फक्त काळंभोर वावर …

आमच्या घरात घुसलं की,
गंगेवर भरलेल्या बाजारासारखी
इथं तिथं अस्ताव्यस्त बसलेली असतात सगळे
कोणी पलंगावर कलंडून
कोण्ही गव्हाच्या पोत्याला पाठ लावून
कोण्ही भुईवर मुटकुळं होऊन
बाया मात्र खुटू-रुटू करत बसतात …

मातीखालचे पेरले दाणे
फक्त पाणी मागत असतात ….

सुट्टीच्या दिवशी
बायकोबरोबर वावरात काम करतो
तीच असते पिकनिक
वर्षा दोन वर्षांनी जाऊन येतो
एसटी नं जेजुर, तूळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर
अन कधी कधी
मोटरसायकलवर वणीचा सप्तशृंगीचा गड

फक्त वावरातलं बाजारात विकलं नीट
तर जगणं होत नाही जड …..

संदीप जगताप
संपर्क – 7218625960

Related posts

आषाढीचा पेरा…

सातबारा…

स्त्री जाणिवेचा अस्वस्थ पदर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406