📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 27, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सोनामुखी (ओळख औषधी वनस्पतीची)

Sonamukhi Medicinal Plant

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये सोनामुखी या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पतीआरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव- सोनामुखी

वनस्पतीचे वर्णन-

केग्युमिनोशी या वनस्पती कुलातील व ६० ते ८० सेटीमीटर वाढणारी झुडूप प्रकारात मोडणारी द्विदल वनस्पती आहे.

औषधी उपयोग

औषधे बनविण्यासाठी प्रामुख्याने वाळलेल्या पानांचा व रोगांचा उपयोग करतात. यामध्ये सेनोसाईड अ-ब-क-ड असून याचा उपयोग आयुर्वेदाबरोबरच युनानी व अॅलोपेथी औषधामध्ये केला जात आहे. सोनामुखीचा स्वाद कडवट, चिकट व उत्तेजक आहे. पचनशक्ती वाढवणे, भूक वाढवणे, पोट साफ होणे व चेहऱ्यावरील मुरूम तसेच मोठ्या पेशी मधील वायू दूर करण्यास उपयोगी आहे.

हवामान व जमीन

उष्ण व समशीतोष्ण हवामानात हे पिक चांगले येते. हलक्या मुरमाड व पडीक व निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले येते.

लागवड

सुधारित वान- A L T F 2 त्रिकनेली सेना व सोना याचा लागवडीसाठी वापर करावा. हेक्टरी जमिनीसाठी १५ किलो बियाणे आवश्यक आहे. पाण्याची सोय असेल तर वर्षभर लागवड करता येते.

खते

पेरणीवेळी २५ किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर पहिल्या व दुसऱ्या महिन्यानंतर २५ किलो नत्र द्यावे. आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

काढणी/उत्पन्न

झाडावर ८० ते ९० दिवसांनी पाने कापणीसाठी तयार होतात. जमिनीपासून ८ ते १० सेमी. अंतराने कापणी करावी. रोपे उपटली जाणार नाहीत. याची काळजी घ्यावी. वर्षभरात ४ कापण्या कराव्या. पाने सावलीत वाळवावीत. प्रती हेक्टरी १५ ते २० क्विटल पाने व ४ ते ५ क्विंटल शेंगा मिळतात. पाने ३० ते ६० रुपये किलो तर शेंगा ५० ते ६० रुपये किलो दराने विकली जातात.

Related posts

शेतकरी विकत घेणे आहे, रांगा लावा…? Farmers Agitation for Compensation

गावराई सड्यावरील कातळशिल्पे चिरेखाणीच्या भक्ष्यस्थानी Petroglyphs Sindhudurg Rock Art

खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!