fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 28, 2026
Home » शेवगांव येथे होणाऱ्या पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ अनिल माळी
काय चाललयं अवतीभवती

शेवगांव येथे होणाऱ्या पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ अनिल माळी

Dr Anil Mali to chair Pakshimitra Sammelan to be held in Shevgaon

३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन शेवगांव येथे,
संमेलन अध्यक्षपदी डॉ.अनिल माळी यांची निवड

अमरावती : येथे या वर्षीचे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगांव येथे होत असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून नाशिक येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक, संशोधक डॉ. अनिल माळी यांची निवड करण्यात आली आहे, अशी महिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.

पक्षिमित्रांचे संघटन असलेली महाराष्ट्र पक्षिमित्र ही संस्था राज्यात गेली चार दशके कार्यरत असून, पक्षी अभ्यास, संवर्धनजनजागृती यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेची राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर पक्षिमित्र संमेलने होत असतात. अशा प्रकारचे संघटन आणि पक्षिमित्रांचे संमेलने घडवून आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असून संपूर्ण राज्यात आजवर ३६ राज्यस्तरीय संमेलने व विभाग स्तरावरील ३० संमेलनांचे आयोजन आजवर करण्यात आले आहे.

या वर्षीचे चे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगांव येथील न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज यांचे यजमानपदाखाली शेवगांव येथे होणार आहे. शेवगांव येथील या महाविद्यालयाच्या प्रांगणात ०१ आणि ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होत आहे. या संमेलनाच्या पूर्वी स्थानीक स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन सुद्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या संमेलनासाठी संपूर्ण राज्यातून व राज्याबाहेरून किमान २५० प्रतिनिधी उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल माळी हे पक्षी संवर्धन, जनजागृती यासाठी कार्यरत असून त्यांनी महाराष्ट्र पक्षिमित्रच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी “पक्षी अभ्यासक्रमाची” निर्मिती सुद्धा केलेली आहे. त्यांनी तयार केलेला हा अभ्यासक्रम आज अनेक शाळांमधून शिकविला जात आहे. ते महाराष्ट्र पक्षिमित्रचे जेष्ठ सभासद असून अनेक संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.

Related posts

भारतात रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ

दमसाचे ३६ वे साहित्य संमेलन शुक्रवारपासून गडहिंग्लजला

इतिहासातल्या नोंदी विना धनगरी संस्कृतीच मरण अधिक क्लेषदायक

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!