April 28, 2026
२६ ते २९ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता वाढण्याची शक्यता. कोकण, घाटमाथा, विदर्भ, मराठवाड्यात मध्यम पाऊस, धरणांतून पाणी विसर्ग सुरू राहण्याची दाट शक्यता.
Home » ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रियतेची शक्यता 
गप्पा-टप्पा शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रियतेची शक्यता 

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – ह्या पावसाची शक्यता कधी व कोठे?

माणिकराव खुळे – संपूर्ण महाराष्ट्रात, परवा २६ ऑगस्ट मंगळवार ते शुक्रवार २९ ऑगस्टच्या चार दिवसा दरम्यान, मान्सून  काहीसा सक्रिय होवून, मध्यम पावसाची शक्यता जाणवते. हा संथगतीने पडणारा आणि दुसऱ्या व शेवटच्या स्पेल चा ‘मघा’  नक्षत्रातील पाऊस आहे.
                   विशेषतः हा पाऊस रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, खान्देश, छ.सं.नगर, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली सह संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात, तसेच सह्याद्रीच्या नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडण्याची शक्यता अधिक जाणवते. त्यामुळे  कोकण व घाटमाथ्यावरील पावसाचे सातत्य पाहता, सह्याद्री कुशीतील नाशिक, पुणे, अ. नगर, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून नद्या व कॅनॉल पात्रात  अगोदरच ओव्हरफ्लो होत असलेला पुर-पाणी विसर्ग असाच टिकून राहू शकतो, असे वाटते.

प्रश्न -कोणत्या वातावरणीय प्रणाल्यातून ह्या पावसाची शक्यता जाणवते ? 👇
माणिकराव खुळे –   i)बं. उपसागरात, सोमवार दि.२५ ऑगस्ट दरम्यान होणारा एम.जे.ओ. चा प्रवेश
                 ii)ईशान्य मध्य प्रदेशावर समुद्रसपाटीपासुन ७.६ किमी उंचीपर्यन्त तयार होणारे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र आणि वायव्य दिशेकडे होणारे त्याच्या मार्गक्रमणाची शक्यता
               iii) देश मध्यावरचा दक्षिणेकडे सरकण्याची शक्यतेचा हवेच्या कमी दाबाचा पूर्व-पश्चिम मान्सूनचा आस

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

रामसर स्थळांच्या यादीत भारतातील आणखी पाच स्थळांचा समावेश

समुद्र शैवाल शेती – एक नवा उद्योग, एक नवं भविष्य

एनटीपीसी आरजीपीपीएल रत्नागिरी टाउनशिप ठरली आयजीबीसी नेट झिरो जल प्रमाणपत्र मिळविणारी भारतातील पहिली टाउनशिप

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!