fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 16, 2026
Home » मे च्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मे च्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता

Cloudy sky and rain in Kerala coast indicating early monsoon arrival by end of May 2025.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रशांत महासागरातील समुद्री पाण्याचे तापमान व तेथील हवेचे दाब व मॉन्सून आगमनासंबंधीच्या इतर पाच वातावरणीय घडामोडी पाहता मॉन्सून देशाच्या दक्षिण टोकावर म्हणजे केरळात त्याच्या सरासरी तारखेच्या चार दिवस अगोदर म्हणजे २७ मे ह्या प्रावधानिक तारखेला दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील वर्षी ३० मे ला अपेक्षित असतांना तो ३१ मे ला केरळात दाखल झाला व प्रत्यक्षात महाराष्ट्रात मान्सूनची अरबी समुद्रीय शाखाच १० ते ११ जूनला महाराष्ट्रात पोहोचली होती. परंतु मान्सूनी प्रवाहात ताकद नव्हती.

               ह्या वर्षी २७ मे ह्या तारखेत कमी अधिक चार दिवस विचारात घेतले तर मान्सून ह्या वर्षी केरळात २३ ते ३१ मे दरम्यान कधीही दाखल होवु शकतो.

                मुंबईत १० जूनला व सह्याद्री ओलांडून महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात १५ जुन ला मान्सून अपेक्षित असला तरी अरबी समुद्रात पश्चिम कि. पट्टी समांतर मुंबईकडे येणाऱ्या मान्सूनच्या प्रवाहात बळकपणा किती आहे, हे पाहूनच महाराष्ट्रात मान्सून जुनच्या कोणत्या तारखेला प्रवेश करील, हे सांगता येईल.
              त्या अगोदर पूर्वमोसमी अवकाळी पावसाच्या सरीची अपेक्षा करू या!

ह्या वर्षी  पुढील १५ दिवस म्हणजे २५ मे पर्यन्त पूर्वमोसमी गडगडाटी अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे, दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता असल्यामुळे दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही. त्यामुळे ह्या वर्षीचा मे महिना आल्हाददायक जाईल असे वाटते.

Related posts

देशातर्गत कापसाचे भाव पाडण्याचा केंद्र सरकारचा डाव – किसान सभेचा आरोप

मोहाडी येथे मार्चमध्ये ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन

बायोटेक उपक्रमांसाठी 75 ‘अमृत’ अनुदानाची  घोषणा,

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!