June 1, 2026
Home » मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

Kavi Kalidas Mandal, Barshi invites entries for the Meghdoot Award 2026. First poetry collections published in 2025 are eligible. Submit three copies by June 20.

बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने दरवर्षी आषाढ महिन्यात पहिल्या रविवारी कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे औचित्य साधून कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहास मेघदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षीही हा सोहळा होणार असून यासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब घावटे यांनी केले आहे.

यावेळी माजी अध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी, रामचंद्र इकारे, प्रा. रविराज फुरडे, उपाध्यक्ष सुमन चंद्रशेखर, कार्याध्यक्ष प्रकाश गव्हाणे, सचिव अर्चना पोळ, सदस्य शिवानंद चंद्रशेखर आदी मान्यवर उपस्थित होते.

गेली 35 वर्ष कवी कालिदास मंडळ साहित्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने मंडळाच्या वतीने दरवर्षी नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहाला मेघदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीही जानेवारी 25 ते डिसेंबर 25 या कालावधीत प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहास यावर्षीच्या कालिदास महोत्सवामध्ये मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

हे पुरस्कार पं. ना. कुलकर्णी यांचे स्मरणार्थ ज्येष्ठ साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी यांचे वतीने व मातोश्री श्रीमती जिजाबाई गव्हाणे यांचे स्मरणार्थ ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. यावर्षीच्या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी कालिदास मंडळाने केले आहे. तरी काव्यसंग्रहाच्या तीन प्रती 20 जूनपर्यंत स्वतःचे छायाचित्र व अल्प परिचययासह पाठवाव्यात.

काव्यसंग्रह पाठविण्याचा पत्ता –
श्री. प्रकाश गव्हाणे, ईश्वरी अभ्यासिका, पाटील प्लॉट , शिवाजी नगर बार्शी.
ता. बार्शी जि. सोलापूर पिनकोड 413 411 मोबाईल नंबर 9763466830

Related posts

जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत – अभिनेते अनिल गवस

कुंडल-कृष्णाई प्रतिष्ठानतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार २०२५ साठी आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!