April 7, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी विचारांची डिजिटल नगरी

जाहीरातचे दर फलक

१. Call To Action (CTA) Banner जाहीरात

वेबसाइटच्या वरच्या भागात दिसणारा मोठा आकर्षक बॅनर

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ २,०००
३ महिने ₹ ५,०००
६ महिने ₹ १०,०००

२. Sponsored Advertisement Banner (Home Page Content)

कालावधी जाहीरात दर
१ महिना ₹ ५००
३ महिने ₹ १,५००
६ महिने ₹ ३,०००

जाहीरातीसाठी संपर्क

व्यवस्थापक, इये मराठीचिये नगरी वेब पोर्टल
श्री अथर्व प्रकाशन

संपर्क – ९०११०८७४०६

```
Minimum support price of coconut fixed for 2025 season
Home » 2025 च्या हंगामासाठी खोबऱ्याचा किमान आधारभूत दर निश्चित
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

2025 च्या हंगामासाठी खोबऱ्याचा किमान आधारभूत दर निश्चित

2025 च्या हंगामासाठी खोबऱ्याचा किमान आधारभूत दर (एमएसपी)

नवी दिल्ली – आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025 च्या हंगामासाठी खोबऱ्याच्या किमान आधारभूत दराला (एमएसपी) मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला किफायतशीर भाव मिळावा, यासाठी सरकारने 2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केले होते की, हमी देण्यात आलेल्या सर्व पिकांचे एमएसपी अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट पातळीवर निश्चित केले जाईल.

त्यानुसार, 2025 च्या हंगामासाठी योग्य सरासरी गुणवत्तेच्या मिलिंग म्हणजेच तेल गिरणीयोग्य खोबऱ्याचा एमएसपी ₹ 11582/- प्रति क्विंटल, तर गोटा खोबऱ्याचा एमएसपी ₹ 12100/- प्रति क्विंटल इतका निश्चित करण्यात आला आहे.

सरकारने मिलिंग खोबरे आणि गोटा खोबऱ्याचा एमएसपी विपणन हंगाम 2014 मधील ₹ 5250 प्रति क्विंटल आणि ₹ 5500 प्रति क्विंटल वरून विपणन हंगाम 2025 मध्ये ₹ 11582 प्रति क्विंटल आणि ₹ 12100 प्रति क्विंटल वर आणला असून, तो अनुक्रमे 121 टक्के आणि 120 टक्के इतकी वृद्धी नोंदवत आहे.

एमएसपी मधील वृद्धी  नारळ उत्पादकांना चांगला मोबदला मिळवून देईलच त्याचबरोबर  शेतकऱ्यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नारळ उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी खोबरे उत्पादन वाढवायला प्रोत्साहन देईल.

नाफेड अर्थात भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ, आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ,  मूल्य समर्थन योजने अंतर्गत खोबरे आणि सोललेल्या नारळाची खरेदी करणारी केंद्रीय नोडल एजन्सी (CNAs) म्हणून काम करेल.

Related posts

एका दिवसाचे परान्न…

भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज

गझल, काव्य लेखन कार्यशाळा व काव्य संमेलनाचे आयोजन

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!