May 30, 2026
Home » मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा
काय चाललयं अवतीभवती

मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा

Marathi Blog Writing Competition

मुंबई – भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मराठी साहित्य संघातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी साहित्याविषयी ओढ निर्माण व्हावी म्हणून मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा आयोजित केली आहे, तरी विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ . मनोज वराडे व अशोक बेंडखळे यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी मराठी साहित्यात तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि साहित्यासमोरील आव्हाने असे दोन विषय निश्चित केले असून या विषयावर कमीत कमी ५०० व जास्तीत जास्त ७०० शब्दांत ब्लॉग लेखन करुन २४ डिसेंबर २०२४ पर्यंत sahityasangha@gmail.com या ईमेलवर आपल्या ब्लॉगची लिंक संपूर्ण नाव, महाविद्यालयीन शिक्षण तपशील आणि भ्रमणध्वनीसह पाठवण्यात यावी.

या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ३००० रुपये रोख, द्वितीय पारितोषिक २००० रुपये रोख व तृतीय पारितोषिक १००० रुपये रोख असे असून जानेवारी २०२५ मध्ये ब्लॉग लेखकांचे संमेलनात विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – मनोज वराडे भ्रमणध्वनी ९८६९३३६३३७

Related posts

गार्गी आणि इतर एकांकिका पुस्तकात मानवी नात्यांचं सहज सुंदर भाष्य – कवी अजय कांडर

अक्षरसागर साहित्य मंच गारगोटीचे साहित्य पुरस्कार – 2025 जाहीर

सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त : कृषी अधिकारी उमेश पाटील

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!