fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 25, 2026
Home » यंदाच्या हंगामात २२ एप्रिलपर्यंत 3.92 लाख मेट्रिक टन तूर खरेदी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

यंदाच्या हंगामात २२ एप्रिलपर्यंत 3.92 लाख मेट्रिक टन तूर खरेदी

Farmers unloading bags of tur (pigeon pea) at a procurement center in India during the 2025 season

प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरू

नवी दिल्‍ली – डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, सरकारने 2024-25 या खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत (पीएसएस) राज्याच्या उत्पादनाच्या 100% समतुल्य तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.

सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात अशी घोषणा देखील केली आहे की देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता प्राप्त करण्यासाठी 2028-29 पर्यंत पुढील चार वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% तूर, उडीद आणि मसूर खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे केली जाईल.

त्यानुसार, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 2024-25 च्या खरीप हंगामात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एकूण 13.22 लाख मेट्रिक टन तूर (अरहर) खरेदी करण्यास मान्यता दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी आंध्र प्रदेशात 90 दिवसांचा खरेदीचा कालावधी आणखी 30 दिवसांनी वाढवून पुढील महिन्याच्या 22 तारखेपर्यंत खरेदी करण्यासही मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत एमएसपीवर खरेदी सुरू आहे आणि या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत या राज्यांमध्ये एकूण 3.92 लाख मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आली आहे ज्याचा फायदा या राज्यांतील 2,56,517 शेतकऱ्यांना झाला आहे. नाफेडच्या ई-समृद्धी पोर्टल आणि एनसीसीएफच्या ई-संयुक्ती पोर्टलवर पूर्व-नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून देखील तूर खरेदी केली जाते. भारत सरकार नाफेड आणि एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सींद्वारे शेतकऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या किमान आधारभूत किमतीवर तुरीची 100 टक्के खरेदी करण्यास कटिबद्ध आहे.

Related posts

महिलांच्या आहारात प्रोबायोटेक्स का असावे ?

तूर घ्या आता तिन्ही हंगामांत

वातावरणीय बदल परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!