fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 12, 2026
Home » पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पुढील पाच दिवस मध्यम पावसाची शक्यता

२४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान राज्यात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता. हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील दाबामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

शुक्रवारपासुन पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार २८ ऑक्टोबर पर्यन्त उत्तर विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता जाणवते.  विशेषतः ह्या पावसाची शक्यता मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगांव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर जिल्ह्यात अधिक जाणवते.

तारीख-वार नुसार जिल्हनिहाय पावसाची शक्यता अशी –

दि.२४ शुक्रवार- बीड, धाराशिव, लातूर, उत्तर, अहिल्यनगर, रत्नगिरी, सिंधुदुर्ग
दि.२५-नाशिक, जळगांव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छ.सं.नगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर
दि.२६-मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, नांदेड
दि.२७-धुळे, मुंबई, नाशिक, खान्देश, अहिल्यनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर
दि.२८-पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड

कश्यामुळे पावसाची शक्यता ?

i)आज पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैरूक्त ला ५७० किमी. अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात ह्या मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्यकडे मार्गक्रमाणची शक्यता जाणवते.

ii) आग्नेय बं उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे उद्या मध्य बं. उपसागारात मार्गक्रमण होवून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याच्या शक्ययेमुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

Related posts

जगण्याला नवी उभारी देणारी कविता : मातीतलं सोनं

प्रदूषणातून पुनर्जन्म : जगातील देश नद्या स्वच्छ कशा करत आहेत ?

शेपूची भाजी आणि चहा…गुण पहा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!