May 9, 2026
fake-recruitment-process-by-an-organization-in-the-name-of-union-ministry-of-rural-development
Home » केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावे एका संस्थेद्वारे खोटी नोकर भरती प्रक्रिया
क्राईम शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावे एका संस्थेद्वारे खोटी नोकर भरती प्रक्रिया

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय त्यांच्याद्वारा राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही अधिकृत नोकर भरती प्रक्रियेसाठी, कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया शुल्क वा इतर कोणतेही शुल्क आकारत नाही, तसेच अर्जदारांच्या बँक खात्यांविषयीचे तपशीलही मागत नाही.

नवी दिल्ली – राष्ट्रीय ग्राम विकास आणि सामाजिक मनोरंजन अभियान (National Rural Development & Recreation Mission – NRDRM) या नावाच्या संस्थेने केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावाने नोकर भरतीची खोटी आणि फसवी जाहीरात दिली आहे. याविषयी जनतेत जागृती करण्याकरता केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. या संस्थेने डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली, 110001 या पत्त्यावर आपले कार्यालय असल्याचा दावा केला आहे, तसेच www.nrdrm.com (http://www.nrdrm.com) आणि www.nrdrmvacancy.com (http://www.nrdrmvacancy.com) ही आपली संकेतस्थळे असल्याचेही म्हटले आहे. मात्र या दाव्यात नमूद अशा प्रकारची कोणतीही संस्था आणि संकेतस्थळे आपल्या अखत्यारीत कार्यरत नसल्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला कळवले जात आहे की इथे नमूद राष्ट्रीय ग्राम विकास आणि सामाजिक मनोरंजन अभियान (National Rural Development & Recreation Mission – NRDRM) या संस्थेद्वारा किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांद्वारा केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाच्या नावे राबवलेली नोकर भरतीशी संबंधित कोणतीही प्रक्रिया ही पूर्णतः खोटी आणि फसवी असून अशा कोणत्याही प्रक्रियेला केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे कसल्याही प्रकारचे समर्थन नाही.

केंद्रीय ग्राम विकास मंत्रालय त्यांच्याद्वारा राबवल्या जाणाऱ्या कोणत्याही अधिकृत नोकर भरती प्रक्रियेसाठी, कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया शुल्क वा इतर कोणतेही शुल्क आकारत नाही, तसेच अर्जदारांच्या बँक खात्यांविषयीचे तपशीलही मागत नाही. तसेच rural.gov.in हेच केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ असून, या विभागातील भरतीशी संबंधित माहिती याच संकेतस्थळावर प्रकाशित केली जाते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रामध्ये 1,445 चौ. किमी वाढ

जळगांव, जेऊर, नाशिक, यवतमाळला थंडीची लाट ! तर ‘कोकणातही थंडी !

हमी भाव व्यवस्थेतील त्रुटी अन् स्वामीनाथन शिफारशी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!