📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 15, 2026
कविता

कमळं तरी उगवतील कशी ?

How can lotuses grow Poem by Shripad Bhalchandra Joshi

किती करणार
आहात
परस्परांवर
चिखलफेक

चिखलच
संपून गेला तर
कमळं तरी उगवतील
कशी ?

ती उगवलीच
नाही तर कोणाला
कोणी अर्पण
करणार कशी ?

अर्पणाऐवजी
तर्पणाचीच
येईल ना
वेळ

चिखलफेक
करणाऱ्यांसाठीही
चिखल
उरणारच नाही

मग
तुमच्याकडे
कुणी ढुंकूनही
बघणारच नाही

तुम्हा लोकांच्याच
या रोजगाराचे
मग
काय होईल ?

बाकी तर काही येतच नाही ना तुम्हाला
नंतर ठेवणार मग
कोण कुठे कामाला ?

श्रीपाद भालचंद्र जोशी

Related posts

करतोय का आम्ही आमचं जगणं सुकर

हे राज्य..

श्रद्धा आहे…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406