📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 17, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘विदर्भाबरोबर उर्वरित महाराष्ट्रातही दोन तीन दिवस गारपीटीची शक्यता

Satellite image showing weather system over Vidarbha and Maharashtra indicating hailstorm activity

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

महाराष्ट्रासाठी अवकाळीचा आठवड्याभरासाठी (३ ते १० मे) दिलेला अंदाज कायम असुन आता कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातही दोन ते तीन दिवस व काही जिल्ह्यांत अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपीटीची शक्यताही जाणवते.

अवकाळीची व गारपिटीची शक्यता असणारे जिल्हे अन् तारखा –

नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव – ४ ते ७ मे (रविवार ते बुधवार)
नगर, पुणे, सातारा, सांगली ,कोल्हापूर, सोलापूर – ६ व ७ मे ( मंगळवार बुधवार)
संपूर्ण मराठवाडा- बुधवार ७ मे
संपूर्ण विदर्भ – ४ व ५ मे (रविवार- सोमवार)

दिवसाचे तापमान कोकण ३४ ते ३५ डिग्री, मध्य महाराष्ट्र ३७ ते ४२, मराठवाडा ४१ ते ४२ डिग्री, विदर्भ ४२ ते ४४ डिग्री.असे असले तरी कमाल व किमान तापमाने ही सरासरी व काही ठिकाणी सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे मे महिना असूनही, उष्णतेच्या तापेपासून ही सुसह्यताच आहे, असे समजावे. संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा  उष्णतेच्या लाटेची शक्यता कुठेही सध्या जाणवत नाही.

गारपीटीची शक्यता कश्यामुळे?

             छत्तीसगडवर घड्याळ काटा दिशेच्या विरुद्ध फिरणाऱ्या आवर्ती व अरबी समुद्रात दिड किमी. उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती अश्या दोन्हीही चक्रीय वाऱ्यांच्या संगमातून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता  ह्या दोन तीन दिवसात निर्माण झाल्याचे जाणवते.

Related posts

विश्वभारती संकल्पना अन्न सुरक्षेसाठी एक सर्वसमावेशक मानवकेंद्रित दृष्टिकोन

असा हा रंगिला खैर !

कष्टकऱ्यांना जगण्याचं बळ, आत्मभान देणारी कविता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!