📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 12, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केळी, संत्रा, मोसंबी, लिंबू पिक सल्ला

Banana Orange Mosambi Lemon crop advice

आठवडी पिक सल्ला (केळी आणि संत्रा-मोसंबी-लिंबू ) 🍌🍌🍊🍋

केळी पिक सल्ला खत व्यवस्थापन

👉🏽मृगबाग : लागवडीनंतर १६५ दिवसांनी प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
लागवडीनंतर २१० दिवसांनी प्रतिझाड ३६ ग्रॅम युरिया द्यावा.

नवीन कांदेबाग :
पहिला हप्ता लागवडीनंतर ३० दिवसांच्या आत द्यावा (प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पॉटेश).
दुसरा हप्ता लागवडीनंतर ७५ दिवसांनी द्यावा (प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया).

👉🏽ठिबक सिंचनाद्वारे खत देताना,
नवीन कांदे बाग : प्रति हजार झाडासाठी लागवडीपासून १ ते १६ आठवड्यांपर्यंत ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनोअमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
मृग बाग : लागवडीपासून १७ ते २८ आठवड्यांपर्यंत १३ किलो युरिया व ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
👉🏽निंबोळी ढेप
नवीन कांदेबागेस : प्रतिझाड २०० ग्रॅम
मृग बागेस : प्रति झाड ५०० ग्रॅम

संत्रा-मोसंबी-लिंबू पिक सल्ला 🍋🍊

पाणी व्यवस्थापन
🍊ठिबक सिंचन संच असल्यास त्याच्या नळ्या पसरून घ्याव्यात. या दिवसांमध्ये संत्रा व मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला प्रति दिन ८ लिटर, चार वर्षांच्या झाडाला ३६ लिटर, आठ वर्षांच्या झाडाला ८५ लिटर आणि दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडाला १०५ लिटर पाणी द्यावे.
🍋संत्रा, मोसंबीच्या तुलनेमध्ये लिंबूच्या झाडांची पाण्याची गरज कमी असते. एक वर्षाच्या झाडाला प्रति दिन ४ लिटर, चार वर्षांच्या झाडाला १५ लिटर, आठ वर्षांच्या झाडाला ५३ लिटर पाणी आणि दहा वर्षे व त्यावरील झाडाला ८८ लिटर पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास दुहेरी रींग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. पाटपाणी बागेमध्ये देऊ नये.
🌳जमिनीची मशागत व निंदणी करून घ्यावी.

(सौजन्य – कृषक पीक सल्ला)

Related posts

पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

गच्चीवर उतरत्या छप्पराची परवानगी अन् सक्ती गरजेची

खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!