May 13, 2026
नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर व विदर्भात १५ नोव्हेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांचे सविस्तर विश्लेषण व तापमानाचा आढावा.
Home » शनिवारपर्यंत अर्थात पुढील ५ दिवस थंडी कायम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शनिवारपर्यंत अर्थात पुढील ५ दिवस थंडी कायम

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२

.

थंडीचे दिवस –
                         
आजपासुन नाशिक, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर सह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा व खान्देश  मधील २६ जिल्ह्यांत पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि. १५ नोव्हेंबर (लहान एकादशी, आळंदी यात्रे)पर्यंत सध्य:स्थितीत रात्री जाणवणारी थंडीसारखी थंडी जाणवेल, असे वाटते.
        
जळगांवात तीव्र थंडीची लाट-

जळगांवला आज पहाटे पाच वाजता ९.२ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन सरासरीपेक्षा ६.७ इतक्या अंश से. ने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची  तीव्र लाट अनुभवली गेली.  जळगांवचे दुपारी ३ चे कमाल तापमानही २९.७ अंश से. इतके नोंदवून सरासरीच्या ३.७ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे. त्यामुळे तेथे व लगतच्या परिसरात रात्री बरोबर दिवसाही हूड-हुडी जाणवली.

थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती –

महाराष्ट्रातील डहाणू, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जेऊर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड  ह्या शहरांबरोबरच  संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.

वातावरणीय बदल –
                 
                    रविवार दि. १६ नोव्हेंबर पासुन जर वातावरणीय काही  बदल झाल्यास त्यावेळी अवगत केला जाईल.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

शेतीभान देणारे संमेलनाध्यक्ष अमर हबीब

औषधी गुणांचा झाडोरा

अंजिराच्या ज्यूसची पहिली खेप पोलंडला रवाना

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!