May 13, 2026
कोल्हापूरकरांनी ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुर्मिळ खग्रास चंद्रग्रहणाचा देखावा अनुभवला. 'ब्लड मून'चा हा अनोखा खगोलीय सोहळा १ तासाहून अधिक पाहायला मिळाला.
Home » कोल्हापूरकरांनी पहिला अद्भुत चंद्रग्रहणाचा देखावा
काय चाललयं अवतीभवती

कोल्हापूरकरांनी पहिला अद्भुत चंद्रग्रहणाचा देखावा

कोल्हापूर : रविवारच्या रात्री कोल्हापूरकरांनी आकाशात घडणारा एक भव्य आणि दुर्मिळ खगोलीय देखावा डोळ्यांत भरून पाहिला. या रात्री झालेला खग्रास चंद्रग्रहण हजारो लोकांनी आपल्या छतावरुन, टेलिस्कोपद्वारे किंवा फक्त डोळ्यांनीच न्याहाळला. स्पष्ट आकाशामुळे हा देखावा अधिकच मनोहर झाला.

ग्रहण कोल्हापूरमध्ये रात्री ११ वाजता सुरवात झाली. पाऊस आणि ढगाळ वातावरण कमी असल्याने चंद्रावर पृथ्वीची सावली हळूहळू पडताना पाहणे शक्य झाले. रात्री ११ वाजून ४१ मिनिटांनी चंद्र संपूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत शिरला, यालाच खग्रास ग्रहण म्हणतात. या काळात चंद्राचा रंग तांबूस अथवा केशरी रंगाचा दिसतो, यालाच ‘ब्लड मून’ असे संबोधले गेले. हा अद्भुत देखावा साधारण १ तास २५ मिनिटे पाहायला मिळाला. खग्रास चंद्रग्रहणाची सांगता रात्री १२ वाजून २२ मिनिटांनी झाली तर छायाकल्प चंद्रग्रहणाची सांगता रात्री २ वाजून २५ मिनिटांनी झाली अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी दिली.

हे ग्रहण भारतासह युरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील बऱ्याच भागातून दिसला. कोल्हापूरमध्ये पाहिलेला हा पूर्ण चंद्रग्रहण हा २०२५ च्या वर्षातील दुसरा आणि शेवटचा पूर्ण चंद्रग्रहण होता. पुढील पूर्ण चंद्रग्रहण इ.स. २०२६ मध्ये दिसेल असे त्यांनी नमूद केले.

खगोलविज्ञानाचे छंद असणाऱ्या काही उत्साही लोकांनी त्यांचे टेलिस्कोप आणून इतर उत्सुकांनादेखील हा देखावा दाखवला. खग्रास चंद्रग्रहाच्या वेळी चंद्राच्या रंगात होणारे बदल पाहणे हा एक अनन्यसाधारण अनुभव होता असे मत चंद्रग्रहण पाहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केले.खगोलवैज्ञानिक आणि आकाशनिरीक्षणाचे छंद असणाऱ्या लोकांसाठी ही रात्र खरोखरच अविस्मरणीय ठरली.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

स्वप्नपूर्तीसाठी धडपडत राहाणे हाच मानवी मनाचा धर्म आहे – डॉ. यशवंत थोरात

नीलकांचन ग्रंथाचे रविवारी कल्याणला प्रकाशन

हरवलेला गाव…यंदाच्या प्रतिभा दिवाळी अंकाचा विषय

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!