!-- afp header code starts here -->
April 21, 2026
महाराष्ट्रात १० ठिकाणी तीव्र थंडीची लाट तर ५ ठिकाणी लाटेसदृश्य स्थिती. २१ नोव्हेंबरपर्यंत कडाक्याची थंडी कायम राहणार. यवतमाळ, जेऊर, जळगावला सर्वाधिक थंडी.
Home » महाराष्ट्रात १० ठिकाणी थंडीची लाट तर ५ ठिकाणी लाटे सदृश्य स्थिती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात १० ठिकाणी थंडीची लाट तर ५ ठिकाणी लाटे सदृश्य स्थिती

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

    
यवतमाळ, जेऊर व जळगावला तीव्र थंडीची लाट

महाराष्ट्रात आज यवतमाळ, जेऊर व जळगावला पहाटे पाच वाजता अनुक्रमे ९.६, ७ व ७.१ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन ही तापमाने सरासरीपेक्षा अनुक्रमे ७.४, ७.५  व ७.७ इतक्या अंश से. ने  खालावून तेथे व लगतच्या परिसरात तीव्र थंडीची लाट जाणवत आहे.    

सात ठिकाणी थंडीची लाट-

अहिल्यानगर,  नाशिक, मालेगाव, पुणे, गोंदिया, वाशिम व भंडारा येथे आज पहाटे पाच वाजता अनुक्रमे ८.४, ९.२,  ९.६, ९.४  ९.६  १० व १० अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन ही तापमाने तेथील सरासरीपेक्षा अनुक्रमे ५.३, ५.४, ५.५, ५.६, ६.२, ५.२ इतक्या अंश से. ने  खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची लाट जाणवत आहे

पाच ठिकाणी थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती –

महाराष्ट्रातील डहाणू १५.८(-५.९), छ.सं.नगर १०.६(-४.८), सातारा १०.६(-५.५),परभणी १०.८(-५.८),  नागपूर १०.९(४.४)  ह्या शहरात व लगतच्या परिसरात आज थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती अनुभवली गेली.

पुढील ४ दिवस अजूनही थंडीचेच –

सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी, आजपासुन पुढील ४ दिवस म्हणजे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवणार असुन उद्या बुधवार दि.१९ नोव्हेंबर पर्यन्त  अशीच कडाक्याची थंडी जाणवू शकते..
        
थंडी कधी कमी होणार?
           
वारा वहन पॅटर्न मध्ये होणाऱ्या बदलातून शनिवार दि. २२ नोव्हेंबर पासुन महाराष्ट्रात थंडी  कमी होण्याची शक्यता जाणवते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

आठवडाभर काहीसेच अवकाळीचे वातावरण

मध्यम पावसाची शक्यता !

महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!