fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 15, 2026
Home » महाराष्ट्रात काहीशी उघडीपच पण विदर्भ वगळूनच
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात काहीशी उघडीपच पण विदर्भ वगळूनच

विदर्भात १५ सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम, तर उर्वरित महाराष्ट्रात मुंबईसह कोकण, खान्देश व मराठवाड्यात १३ ते १८ सप्टेंबर दरम्यान पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता.

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

               १- विदर्भात पाऊस कायम –

                   सोमवार दि. ८ सप्टेंबर पासुन महाराष्ट्रात जरी काहीशी उघडीप जाणवू लागली असली तरी संपूर्ण विदर्भातील अकरा व  सातारा सांगली सोलापूर बीड  धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली अश्या एकूण वीस जिल्ह्यांत मात्र अजूनही पुढील  सहा दिवस म्हणजे आजपासुन ते सोमवार दि. १५ सप्टेंबर पर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही कायम आहे.
                     विदर्भातील अकरा जिल्ह्यात मात्र मंगळवार दि. १६ सप्टेंबर नंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते.

२-उर्वरित महाराष्ट्रातील उघडीपीनंतरचा पाऊस-

   १२ सप्टेंबर पर्यंतच्या उघडीपीनंतर, उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यातील अश्या एकूण २५ जिल्ह्यांत  शनिवार दि.१३ ते गुरुवार दि. १८  सप्टेंबर दरम्यान पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
            

कोणत्या वातावरणीय प्रणालीमुळे ह्या पावसाची शक्यता आहे.

                 दक्षिण ओरिसा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी दरम्यान  ३.१ किमी. उंचीपर्यंतच्या चक्रीय वारा स्थिती आणि मान्सून आसाचे पश्चिम टोक दक्षिणेकडे  पार गुजराथ पर्यन्त सरकल्यामुळे त्याच्या परिणामातून अरबी समुद्र व बं. उप सागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेतुन मान्सूनी वारे सक्रिय  महाराष्ट्रात शनिवार दि. १३ सप्टेंबर पासुन पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

       

Related posts

यंदा तांदुळ अन् उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज

येत्या दहा वर्षांत पूर्ण होईल वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प

तव्हा हंबरतील गायी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!