May 12, 2026
Home » ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मानले भारताचे आभार
सत्ता संघर्ष

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी असे मानले भारताचे आभार

सर्व जग कोरोनाच्या संकटाने हैराण झाले आहे. प्रत्येकाला आता स्वतःचे उद्योग, नोकरी सांभाळण्यात अडचणी येत आहेत. काहींही नोकऱ्या गमावल्या आहेत तर काहींना उद्योगात फटके बसले आहेत. अशा या त्रस्त वातावरणात कोरोनावर भारतीय बनावटीची लस निश्चितच हवीहवीशी वाटणारी आहे. जगभरातून भारतीय लसीला आता मागणी वाढली आहे.

भारत नेहमीच अडचणीच्या काळात सहकार्य करणारा देश म्हणून ओळखला जातो. नुकतीच भारताने ब्राझीलला कोरोनाची लस पाठवली आहे. यावर भारताचे आभार माननारे सुंदर चित्र ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेर एम बोलसोनारो यांनी शेअर करून भारत देशाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

भगवान मारुतीने बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी संजिवनी बुटीचा पर्वतच आणला होता. या इतिहासाची आठवण करून देत कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी जाहीर लाॅकडाऊनमुळे थंड पडलेल्या देशाच्या विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी भारताने पाठवलेली लस ही हनुमानाची संजिवनी बुटीच आहे असे सांगणारे चित्र सादर करत ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी आभार व्यक्त केले आहेत.

Brazil President says thanks to India in this way

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

सब का साथ ते मोदी की गॅरेंटी

नव्या सरकारचे स्वागत करू या…!

भाजपचा अखेरचा समाजवादी वाटाड्या – नितीशकुमार

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!