📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 6, 2026
कविता

माझ्या संपत्तीत भर कधीच का नाही पडली?

Shripad Bhalchandra Joshi Poem on richness

श्रीमंतांच्या यादीत
आले पुनः तेच ते
त्यांच्या संपत्तीत बघा
किती वाढ झाली
अब्जाधीशांच्याही
यादीत बघा कशी भर पडली
पण समृद्धी त्याने
नेमकी कोणाची वाढली?

कधी तरी तर
सांगा ना
माझ्या संपत्तीत भर
कधीच का नाही पडली?

माझ्याच देशातल्या
संपत्तीतला माझा वाटा
माझ्यापर्यंत का पोहचत नाही?

कोणाकडे
वळता होतो तो
कोण कसा, कुठे
वळता करतो तो?

का थांबले
देणे साधे पेन्शनही
तेही थांबवण्याचा निर्णय
कोणासाठी काढला?

व्याजाचा दर माझ्याच निवृत्तीनंतरच्या
पैशांवरचा का
नाही वाढला?

रोजगारही का
कंत्राटी झाला
तो द्यायलाही मध्ये
हा दलाल कसा आला?

कुठे गेल्या
सामूहिक मालकीच्या
माझ्या जमिनी
कुठे गेला
माझा त्यातला वाटा
मला का उचलाव्या लागतात
रूग्ण अजूनही तिकडे
टाकून त्यांच्यासाठी खाटा?

कुठे गेली औषधे माझी
कोणी ती लंपास केली
वाढणाऱ्यांची
संपत्ती काय आपोआप
स्वतःचा घाम गाळून वाढली?

त्यांचे तर
रोजच मला सांगत असता
त्यांच्याच जाहिराती घेऊन
माझेही
रोज सांगत चला ना त्यांना
माझ्याकडून
काहीच नाही ते घेऊन…

Related posts

झाडे…!

आनंदभान (अभंगसंग्रह ) : एक सामाजिक जाणिवेचा अमृत कुंभ

इज्जतीनं वागणं म्हणजे काय रे बाबु

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406