March 24, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Stormy weather in odisha
Home » ओरिसात चक्रीवादळ आदळण्याची शक्यता
काय चाललयं अवतीभवती

ओरिसात चक्रीवादळ आदळण्याची शक्यता

आज मध्य रात्रींनंतर तीव्र च.वादळ आदळणार ‘ 

       १-चक्रीवादळ स्थिती –

                                   आज गुरुवार दि. २४ ऑक्टोबर च्या मध्यरात्रींनंतर ते शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर च्या सकाळ पर्यन्त ‘ दाना ‘ नावाचे च.वादळ ओरिसातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भितरकणिका व धमरा शहरादरम्यान ताशी १०० ते ११० किमी. वेगाने आदळण्याची शक्यता जाणवते. येथील क्षेत्र हे खारफुटी जंगलाचे आहे. त्यामुळे जीवित हानिची शक्यता कमी वाटते. ह्या परिसरातील उथळ समुद्रामुळे, समुद्रसपाटी उंची ४ ते ५ मीटर आहे.

         २- ठिकाण – 

                          भितरकणिका ठिकाण हे १४५ चौ.कि.मी.मध्ये पसरलेली आहे, असंख्य खाड्या आणि मातीच्या ढिगाऱ्यांनी नटलेले आहे. हे नदीच्या प्रदेशाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ब्राह्मणी आणि बैतरणी नद्या भितरकणिकाजवळ बंगालच्या उपसागराला मिळतात आणि समुद्रातून आलेल्या भरतीमुळे वनस्पती आणि प्राण्यांसाठी एक अनोखे जग निर्माण झाले आहे. भितरकनिकामध्ये भारतातील धोक्यात असलेल्या खाऱ्या पाण्याच्या मगरींची सर्वात मोठी येथे लोकसंख्या आहे. 

        ३- वादळाचे नांव –

                               च.वादळाला ‘ दाना ‘ नांव हे यादीत ‘ कुवेत ‘ राष्ट्राने सुचवलेले अरेबिक भाषेतील नांव असुन ‘मनाचा मोठे पणा ‘ किंवा ‘उदरता’ किंवा ‘औदाऱ्य ‘ असा त्याचा मराठीतील अर्थ आहे. 

       ४- महाराष्ट्राला धोका नाही –

                                              महाराष्ट्राला ह्या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही. वादळ आदळल्यानंतर  त्याची आर्द्रता अवशेष उत्तरेकडे सिक्कीम कडे तर काही अवशेष महाराष्ट्रातील गडचिरोली चंद्रपूर परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगलीपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे त्या भागात रविवार दि. २७ऑक्टोबर ला  केवळ ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

              उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण जाणवते. 

माणिकराव खुळे 

Related posts

उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

आगरकरांचा शेतीविचार

समाजात होत असलेल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब ‘माकडांच्या हाती शाळेची खिचडी’ या कथासंग्रहात

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!