विषारी झाली
हवा
कोंडला सारा
श्वास
विषारी झाला
ताटातला
प्रत्येक
घास
विषारी झाला
इथून तिथून
साराच
अधिवास
पिकते तेही
विषारी
पिकवले जाते
सारेच विषारी
इथून तिथून
सारेच झाले
निव्वळ
विषाचे व्यापारी
– श्रीपाद भालचंद्र जोशी
शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.