May 3, 2026
Then the village where the sparrows did not leave a poem by Indrajit Bhalerao
Home » तेंव्हा चिमण्या सोडत नसायच्या गाव…
कविता

तेंव्हा चिमण्या सोडत नसायच्या गाव…

तेंव्हा चिमण्या सोडत नसायच्या गाव

बाप म्हणायचा काढलेली नखं
दारात कधीच नयेत टाकू
दाणे समजून खातात चिमण्या
आणि मरतात आतडी फाटू फाटू

सुगी संपली की बाप
देवळात नेऊन कणसं बांधायचा
सुगीत हाकललेल्या चिमण्यांसाठी
पाण्याचं मडकं बांधून पुण्य साधायचा

पाखरं असल्या तरी ओळखायच्या
बापाच्या मनीचा भाव
तेंव्हा सुगी संपली तरीही
चिमण्या सोडीत नसायच्या गाव

इंद्रजीत भालेराव

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

तर जगणं होत नाही जड …..

शेपटी…

अनुभुतीचा विस्तार करणारी आजची कविता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!