कविता म्हणजे स्वतःचे स्वतःच्या साठी मस्त जगणे…
आकाशाकडे पहात
मी जगलो
दिशांना कवेत घेत..
हिंडलो..
पायाना ना उसंत
नाही वाट माहित
ते बिचारे मला नेत
फरफरट राहिले.
अंतरीचे गुज बोललो
त्यांनी चेष्टा केली
आणि ज्यांची नजर
चुकवली ते
सोबतीला आले.
जे जे भेटले.
ते ते काहीतरी
देऊन गेले..
आपले हात मात्र
प्रत्येकवेळी
रिकामेच नाही…!
नाही देता आले त्यांना
काहीच
म्हणून ही
शब्दफुले मागे ठेवली
इतकेच …
हाती उरले…
डॉ. बाळकृष्ण लळीत
