📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 24, 2026
कविता

बा.. निसर्गा….

Baa Nirsarga Sarjerao Navle Poem on Vasatoushav

बा.. निसर्गा….

तू देतोस असं भरभरून
रिती करतोस तुझी ओंजळ
कोणी कितीही, कितीही वेळा मागितली तरी
करत नाहीस कोणाला तू दुजाभाव

आमचा प्रत्येक अणू-रेणू तुझाशिवाय अपूर्णच

तू असा बदलांचा सांगाती
आमच्या श्वासात सामावलेला
आमची स्पंदन सतत जागवत ठेवणारा
गाभाऱ्यातल्या निरांजनासारखा

कायम तेवत राहणारा

गोबल वार्मिंगच्या कोंडमाऱ्यात
तू गुदमरतोयस, घुसटमतोयस
पण पण तुझ्या घुसमटीत
करत नाहीस तू त्रागा
आम्हाला ठेवतोयस सदैव प्रफ्फुलीत

आंमच जगणं करतोस सुसह्य..

तुला आम्ही कुरतडतोय, ओरबडतोय
अगदी अघाश्यासारखं पुन्हा पुन्हा
खिळे टोकतोय तुझ्या माथ्यावर
इमल्या इमल्यांचे
तुझ्या उधरालाही आम्ही पोखरतोय

गोडवे गात विकासाचे

आम्ही तुझा देह चिरफाड करतोय
तरीही तू, इतका कसा रे निशब्ध
आम्ही निर्दयी, कठोर, बेगडी
तरी तू , इतका कसा रे संयमी, शांत
तू थकत नाहीस, थांबत नाहीस

कस जमत तुला हे सगळं

कधीकधी आमचा अतिरेक होतोय रे!
मग रूसतोस प्रलय, प्रकोप करत
रूद्रदावतार घेतोस
मिळेल ते कवेत घेत गडप करतोस

इथे ही करत नाहीस मग दुजाभाव

तुझ असणं म्हणजे, आमचं असणं
चराचराचं आस्तित्व तुझ्यात सामावलेलं
आम्ही संपू, आमच्या अनेक पिढ्या संपल्या, संपतील
तू संपत नाहीस, संपणारही नाहीस
युगानुगे तू असा सर्वदूर चिरकालीन

तू आहेस अनंत, अनादी, अकालनीय

कवी – सबना..

Related posts

मनाची पालखी…

विसरू नको बापाला…

कसे विसरू गतवर्षाला…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406