April 17, 2026
महाराष्ट्रात थंडीचा जोर २१ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार, असा अंदाज माणिकराव खु्ळे यांनी व्यक्त केला. जेऊर येथे न्यूनतम तापमान ९°C नोंदले गेले असून अनेक शहरांत गारवा वाढला आहे.
Home » शुक्रवार ता. २१ नोव्हेंबर पर्यंतचे पाच दिवस थंडीचेच
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शुक्रवार ता. २१ नोव्हेंबर पर्यंतचे पाच दिवस थंडीचेच

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

थंडीचे दिवस

                 सध्या महाराष्ट्रात जाणवत असलेली थंडी, पुढील सहा दिवस म्हणजे शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर (मार्गशीर्ष प्रतिपदा) पर्यंत अशीच जाणवणार असुन पुढील ३ दिवस परवा मंगळवार दि. १८ नोव्हेंबर पर्यन्त थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता जाणवते.
                 शनिवार दि. २२ नोव्हेंबर पासुन सध्यापेक्षा थंडी केवळ काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते. त्यावेळी सविस्तर अवगत केले जाईलच.

जेऊरला पुन्हा थंडीची लाट-

                    जेऊरला ला आज पहाटे पाच वाजता ९ अंश से. इतके किमान तापमान नोंदवले असुन सरासरीपेक्षा ५.५ इतक्या अंश से. ने ते खालावून तेथे व लगतच्या परिसरात थंडीची लाट जाणवत आहे.      

  थंडीचे सातत्य टिकून –

                    महाराष्ट्रातील डहाणू , जळगांव, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी ह्या शहरात व संपूर्ण विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात पहाटेच्या ५ च्या किमान तापमानाचा पारा सरासरीच्या ४ ते ५ अंशांनी खालावून तेथे आजही चांगलीच थंडी जाणवली असुन थंडीचे सातत्य टिकून आहे.
                        
दिवसाही जाणवतो गारवा

                     मालेगांव( जि. नाशिक ) जळगांव, बीड, नांदेड, वाशिम येथे दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ डिग्रीच्या आसपास खालवले असल्यामुळे  तेथे व लगतच्या परिसरात रात्री बरोबर दिवसाही काहीसा गारवा जाणवत आहे.   

शेतपिकांना थंडीचा फायदाच

                    गेल्या ८-१० दिवसापासून म्हणजे ८ नोव्हेंबर पासुन जाणवत असलेल्या माफक थंडीमुळे महाराष्ट्रातील सध्याचे बाल्यावस्थेतील रब्बीची शेतपिके, फळ-बागा व इतर भाजीपाला पिकांना मदतच होवु शकते. त्यामुळे सुरवातीच्या प्राथमिक अवस्थेतील ह्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी ही जमेचीच बाजू समजावी, असे वाटते.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती

शनिवारपर्यंत अर्थात पुढील ५ दिवस थंडी कायम

हवामान अंदाज – हलक्या पावसाची शक्यता

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!