June 3, 2025
Home » गझल, काव्य लेखन कार्यशाळा व काव्य संमेलनाचे आयोजन
काय चाललयं अवतीभवती

गझल, काव्य लेखन कार्यशाळा व काव्य संमेलनाचे आयोजन

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजन

अहमदनगर – नवोदितांसाठी गझल व काव्य लेखन कार्यशाळा तसेच काव्य संमेलन अहमदनगर येथे आयोजित करण्यात येतं असून यामध्ये सहभागी होण्यासाठी नवोदितांनी आपली नावें नोंदवावित, असे आवाहन शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे.

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्यावतीने नवोदितांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू असून लवकरच शब्दगंध चे साहित्य संमेलन होणार आहे. त्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. शब्दगंध च्या वतीने परिसंवाद, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन, साहित्य संवाद व कार्यशाळा अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने सुरू असतात.

रविवारी (ता. १८ जुन) रोजी होणाऱ्या या गझल लेखन व काव्य लेखन कार्यशाळेत कवी चंद्रकांत पालवे (अहमदनगर), डॉ. संदीप सांगळे (पुणे) हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सहभागी होणाऱ्यानां काव्यवाचनाची संधी द्यावी मिळणार आहे, यासाठी मोबाईल क्रमांक ९९२१००९७५० (9921009750) वर संपर्क साधावा, असे आवाहन शब्दगंध चे किशोर डोंगरे, अजयकुमार पवार, स्वाती ठूबे, सुभाष सोनवणे, शर्मिला गोसावी, शाहिर भारत गाडेकर, रामकिसन माने, राजेंद्र चोभे यांनी केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading