📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 2, 2026
काय चाललयं अवतीभवती

गारगोटीच्या अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर

State-level awards 2024 announced for Aksharsagar Sahitya Manch of Gargoti

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे 2024 सालचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार 2024 ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर तथा एन. डी. पाटील (कोनवडे) यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती मंचाचे अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी दिली.

जाहीर करण्यात आलेले राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार असे –

कादंबरी –

1) अरुण नवले (सोलापूर) – जागलं
2) डॉ. मीना सुर्वे (सांगली) – ठिगळ

कथासंग्रह

1) डॉ. राज यावलीकर (अमरावती) – गाव विकणे आहे
2) इंद्रजीत पाटील (सोलापूर) – शेलक्या बारा
3) प्रा. अरविंद मानकर (सरवडे) – घुंगरू

कवितासंग्रह

1) धनाजी घोरपडे (सांगली) – जामिनावर सुटलेला काळा घोडा
2) सुनील उबाळे (छ. संभाजीनगर) – उलट्या कडीचं घर
3) सीमा झुंझारराव (मुंबई) – खुल्या मनाच्या खिडक्या
4) डॉ. स्नेहल कुलकर्णी (गारगोटी) – दिशांतर
5) नंदा लाड (पिराचीवाडी) – काव्यनंदा
6) दिपाली सुनील पाटील (मडिलगे) – शब्दांना गवसले सूर

बालसाहित्य

1) विजय जोशी (डोंबिवली पू.) – टोपीवाले फुगे (बालकविता)
2) रविंद्र जवादे (अकोला) – चिंटू आणि त्याचे घर (कथासंग्रह)
3) उर्मिला तेली (भोगावती) – महात्मा गांधी चरित्र

संकिर्ण

1) गंगा गवळी पवार (नाशिक) – धुनीवरल्या गोठी
2) भारत सातपुते (लातूर) – जागरण
3) वर्षा किडे कुळकर्णी (नागपूर) – जाणिव नेणीव
4) सुनील देसाई (मिणचे) – स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया (आत्मचरित्र)
5) सचिन ऐनापूरे (गारगोटी) – मशिनिस्ट थेअरी

लवकरच या सर्व पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.

Related posts

महिलेला न्याय देण्यासाठी पाथ फाऊंडेशनची धडपड…

कवी डॉ. अमुल पावसकर यांच्या ‘अनुभूती ‘ काव्यसंग्रहाचे १७ रोजी कुडाळ येथे प्रकाशन

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406