March 29, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Announcement poster of Gangachandra Sahitya Seva Manch's 2025 poetry awards honoring Marathi poets from Ghatkarwadi
Home » घाटकरवाडीतील गंगाचंद्र साहित्य सेवा मंचचे काव्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

घाटकरवाडीतील गंगाचंद्र साहित्य सेवा मंचचे काव्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – ‘गावडे घरकुल’ प्रेरित आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील ‘गंगाचंद्र’ साहित्य, कला, सेवा मंचच्यावतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती मंचच्या सचिव वैष्णवी दत्तात्रय पाटील व अध्यक्ष दत्तात्रय हरी पाटील यांनी दिली आहे.

राज्यभरातून आलेल्या काव्यसंग्रहातून निवड समितीने चार कविता संग्रहांची निवड केली आहे. यामध्ये श्रीहरी काव्य पुरस्कार २०२५ ‘काळच उत्तर देईल’ या डॉ. श्रीकांत पाटील ( घुणकी, कोल्हापूर ) काव्यसंग्रहास, तर जिजाई काव्य पुरस्कार २०२५ ‘मौनातील चाफा’ या रेखा दीक्षित (आशारेखा) यांच्या काव्यसंग्रहास जाहीर केला आहे.

सुवर्णसाक्षी काव्य पुरस्कार २०२५ भारती पाटील ( कामेरी – सांगली ) यांच्या ‘आदिम दुःखाचे वर्तूळ’ या काव्यसंग्रहास तर गंगाचंद्र विशेष काव्य पुरस्कार २०२५ स्नेहल पंडित ( आजरा, कोल्हापूर ) यांच्या ‘शब्द माझे सोबती’ या काव्यसंग्रहास जाहीर केला आहे.

Related posts

स्मरण-विस्मरणाचा खेळ

अन्नदात्याच्या स्वयंपूर्णतेचाही व्हावा विचार !

भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेचा होणार शास्त्रीय अभ्यास

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!