fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 20, 2026
Home » काय मिळालं……?
कविता

काय मिळालं……?

A heartfelt Marathi poem by Sujoy Desai reflects on floods that destroyed homes yet awakened unity, humanity, and compassion beyond caste and religion.
काय मिळालं त्या पावसाला,
मिळालं काय त्या महापुराला ?
त्राही-त्राही झाली तना-मनांची साऱ्याच
आवरावे कसे आता जिवलगांच्या शोकाला ?

माझ्या माणसांच्या स्वप्नासह - घरकुलेही वाहून गेली
मोठ्या घरट्यातील जीवही बळी पडले थैमानाला!
कोणी कोणास आवरावे? कसे सावरावे ?
युध्दगती आली साऱ्या बांधवांच्या प्रयत्नाला

मोठया आकांताने जीव जीवांसाठी धावला
जणू शिव अल्लासाठी अन अल्ला शिवासाठी धावला
माणूस माणसासाठी धावला हा बोध मज पावला
माणसातील देव आज, देवासाठी माणसातील घावला !

या पुराने वाहून नेले यासह बरेच काही
अहंकारालाही नेले वाहून, नेले जाती धर्माला
आणिले मात्र जवळ त्याने मानवा मानवाला.
अन् पालवी फुटली महापुरातही माणुसकीच्या वटवृक्षाला
माणुसकीच्या वटवृक्षाला

कवी - सुजय सुंदरराव देसाई,
शिक्षक, म. दु. श्रेष्ठी समता हायस्कूल.
मो. ९७६२५३२२९१

Related posts

सावळी

सुखाचा पाऊस आलाच नाही

पंढरीची वारी…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!