📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 9, 2026
कविता

तुम्ही आम्ही फक्त बांडगुळ आहोत मातीचे…

स्वाती ठुबे यांनी लिहिलेली मानवी नश्वरता, देहाचे सत्य आणि मृत्यूपश्चातची प्रक्रिया सांगणारी हृदयस्पर्शी कविता. आपण फक्त मातीचे बांडगुळ आहोत याची जाणीव करून देणारा लेख.

शरीर निकामी झालं की
लाकडावर लाकूड रचून
दूध दही शेवटची अंघोळ
नवीन साडी नवीन धोतर
मीठ कुंकू ,फुलांचे हार
नवरी नवरदेवाचा तो साज
शुभ्र कापडात झाकून
घट्ट दोरीने बांधून
खांद्यावर घेत मिरवताना
तो नटलेला देह
तुला मला पाहत नसतो
कोण किती टाहो फोडतो
शेवटी माणसाला
सरणावर जायचे असते
जळून राख होण्यासाठी
श्वास बंद पडला की कळतं
बाहेरचं तन कितीही सुगंधित
केलं तरी काही वेळा नंतर
दुर्गंधी देणार असतं…….
आत्मा निघून गेला की
तन मातीत पुरव लागत
नाहीतर मातीत उगवलेल्या
झाडाच्या लाकडांसोबत
जाळून खाक करावं लागत
आयुष्याच मोल हे
मातीत मुरलेले आहे
तुम्ही आम्ही फक्त
बांडगुळ आहोत मातीचे…

…स्वाती ठुबे

Related posts

रंगातच उरला नाही रंग…

कूथला

गोकूळी हवा धूंद आहे

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406