📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 23, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषद

Sustainable Agriculture Conference at Shivaji University on April 24 for Farmers Growth

कोल्हापूर : शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, शेतीची शाश्वतता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात 24 एप्रिलला शाश्वत शेती व कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृद्धीसाठी” या विषयावर एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्यावतीने ही परिषद विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, स्वयंसहायता बचत गटांच्या महिला तसेच ग्रामीण विकास क्षेत्रातील घटकांसाठी ही परिषद अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नितीन माळी यांनी दिली.

या परिषदेत शाश्वत शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पद्धती, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी पीक पद्धतींचा अवलंब, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, जलसंधारणाचे उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून मूल्यवर्धन, उत्पादनाचे ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि बाजारपेठेतील संधी याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून पूरक व्यवसाय, लघुउद्योग, घरगुती उत्पादन आणि उद्योजकतेच्या संधी यावर विशेष सत्र आयोजित केले आहे.

यामुळे महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी आवश्यक दिशा मिळेल. परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, कृषी अधिकारी, अनुभवी प्रगतशील शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे सहभागी शेतकरी व महिलांना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रेरणा मिळेल. तसेच शाश्वत शेतीविषयी जागरूकता वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वासही डॉ. माळी यांनी व्यक्त केला.

Related posts

कांदा खरेदीसाठी बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि एनसीसीएफला केंद्राचे निर्देश

भेसळ ओळखायची कशी ?

हवामान बदल चळवळीविषयी सार्थक संवाद सुरु करण्याचा हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन मधून प्रयत्न

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!