📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 14, 2026
संशोधन आणि तंत्रज्ञान

सुर्याभोवती खळे पडण्याचे काय आहे शास्त्रीय कारण

हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थमधून जातात, तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते.


प्रा . डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर

सूर्याभोवती पडणारे खळं हे भौतिकशास्त्रामधील ऑप्टीकसचा भाग आहे .सूर्या भोवतालचे खळं किवां रिंगण हा प्रिसममधून किरणे गेल्यानंतर जसे सप्तरंग दिसतात तसाच हा प्रकार आहे. या सूर्याभोवतीलच्या खळ्यास इंग्रजी मध्ये हॅलो (halo)असे म्हणतात. तसेच मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हणतात. 

वादळ आल्यानंतर आकाशामध्ये जवळ जवळ 20 हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात. या ढगांच्यामध्ये लाखोंच्या संख्यने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. या क्रिस्टल्समधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते. यामध्ये बर्फाचे असणारे तुकडे हे प्रिझम सारखे काम करतात. पाण्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा १. ३३ आहे. पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो. त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थमधून जातात, तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते. यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते. या गोलाची त्रिज्या 22 अंश डिग्री इतकी असते. यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो, तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो. हे खळे फक्त सूर्याभोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवती देखील असे खळे दिसते.

लेखन –  प्रा . डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर

Related posts

ड्रोन : शापीत वरदान !

कातळशिल्पांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले पुस्तक

भूकंपाविषयक गैरसमज दूर करण्यासाठी उपयुक्त असे पुस्तक

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406