📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 19, 2026
काय चाललयं अवतीभवती

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

Damasa marathi Literature award

कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रसिद्ध झालेली पुस्तके येत्या १५ फेब्रुवारी, २०२४ पर्यत पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

दमसाच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह बेळगाव परिसरातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. देवदत्त पाटील पुरस्कार (कादंबरीसाठी), अण्णा भाऊ साठे पुरस्कार (कथा, ललितसाठी), शंकर खंडू पाटील पुरस्कार (कथासंग्रहासाठी), कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार ( वैचारिक, संशोधनासाठी ), शैला सायनाकर पुरस्कार ( कवितासंग्रहासाठी), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन पुस्तकासाठी) याबरोबरच बालवाडःमय पुरस्कारही देण्यात येतो.

तरी इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती , फोटो आणि परिचय अर्जासोबत १५ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, जी-६, स्मृती आपर्टंमेंट, बाबुजमाल रोड, सरस्वती टाँकीजवळ, कोल्हापूर ४१६०१२ या पत्यावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

साखर उद्योगाच्या माहितीचा फायदेशीर ग्रंथ : शरद पवार

चैत्र चाहूल २०२३ चे सन्मान जाहीर !

तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406