📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 18, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश स्थिती

Heat wave-like conditions in 7 districts of Konkan including Mumbai

उष्णतेच्या लाटेची शक्यता ‘

संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर अशा २४ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंश सेल्सिअसने अधिक म्हणजे ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहून आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार ( दि २५ मे) पर्यन्त उष्णतेच्या  लाटेची स्थिती जाणवू शकते, असे वाटते.
दरम्यानच्या पाच दिवसात गुजराथत व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश स्थितीसहित दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल.विशेषतःह्या उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे, पालखेड येथे अधिक जाणवेल, असे वाटते.

वादळी पावसाची शक्यता कायमच-

उष्णतेची लाट सदृश्य स्थिती असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार ( दि.२५ मे )पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असुन गुरुवार, शुक्रवार, (दि.२३ व २४ मे )असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या ह्या ८ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता अधिक जाणवेल.

मराठवाडा व विदर्भातील १९ जिल्ह्यात मात्र शुक्रवार (दि.२४ मे ) पासून ढगाळ वातावरणही निवळेल. तर मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे मात्र २४ मे नंतरही वातावरण टिकून राहील.

मान्सूनचा वेग कायम तर चक्रीवादळही डोकावतेय!

रविवारी ( दि.१९ मे) अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असुन बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते. अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजुन स्पष्ट व्हावयाचे आहे.

माणिकराव खुळे

Related posts

नारळाच्या करवंटीपासून राखी…

अडेनियम डेझर्ट रोझची अशी करा लागवड ? (व्हिडिओ)

शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406