May 26, 2026
Home » महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळी पावसाचे वातावरण
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळी पावसाचे वातावरण

Ten days of unseasonal rain in Maharashtra

            १- अवकाळीचे वातावरण-

             मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासून (१६ ते २५ एप्रिल ) दहा दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी ( गडगडाट, वीजा, वारा) पावसाची शक्यता जाणवते.
             मुंबईसह कोकणात मात्र आजपासून केवळ (१६,१७,१८एप्रिल ) तीन दिवस अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते.

            २- उष्णतेची लाट-

             मुंबईसह उत्तर कोकणातील पालघर ठाणे जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते.
           

             ३-रात्रीचा उकाडा-

             मध्य महाराष्ट्रातील  खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १० जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६ ते १८ एप्रिल) रोजी दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री उकाडा जाणवू शकतो.

             ४- किनारपट्टीवरील दमटयुक्त उष्णता-

              मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा व गुजराथ राज्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

Related posts

राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातल्या दोन मुलांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने केला सन्मान

पिपिलिका मुक्तिधाम ही मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी – डॉ. आनंद पाटील

तरुणांना प्रेरणादायी असा बोली भाषेचा जागर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!