fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 16, 2026
Home » महाराष्ट्रातील ५७ बोलींचा कथासंग्रह ‘माझी बोली माझी कथा’
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रातील ५७ बोलींचा कथासंग्रह ‘माझी बोली माझी कथा’

57 Boli Bhasha in Mazhi Boli Mazhi Katha
  •  ‘माझी बोली माझी कथा’ या ५७ बोलीतील कथासंग्रहात  सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील कथेचाही समावेश 
  • राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध बोलींचा अभ्यास असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न. 

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे झाले 

 आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात, ज्या आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने तसेच वाचकांना ते रंजक वाटावे या उद्देशाने आणि आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोली याचे ज्ञान जनसामान्य, महाविद्यालय व विद्यालय स्तरावरही विद्यार्थ्यांना मिळावे, बोलींच्या अभ्यासाकडे कल वाढावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध बोलीतील कथा संकलित करून सोबतच त्याचा कथासार, कठीण शब्दांचे अर्थ, त्या-त्या बोली विषयी अभ्यासपूर्ण माहिती तसेच लेखकांचा थोडक्यात परिचय अशा धाटणीचा हा ग्रंथ आहे. सदर ग्रंथात ५७ बोलीतील ५७ कथा असून प्रत्येक कथा त्या-त्या बोलीतील अभ्यासक लेखकांनी लिहिल्या आहेत. दिग्गज लेखक मंडळींनी या ग्रंथाला आपले योगदान देऊन समृद्ध केले आहे. या पुस्तकात सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंब्या’ कथेचाही समावेश आहे. 

बोलीविषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच या ग्रंथाच्या रूपाने झाला आहे. माझी बोली, माझी कथा’ असे या ग्रंथाचे नाव असून, या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था यांनी केले आहे.आजवर संशोधनात्मक लेखन आणि संपादन केलेल्या १२ ग्रंथांचा अनुभव पाठीशी घेऊन महाराष्ट्रातील विविध बोलीतील सदर अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संकलन, संपादन आणि समन्वयाची भूमिका डॉ. मोनिका ठक्कर यांनी सांभाळली आहे. 

प्रत्येक प्रांतात बोली या विषयी अभ्यास होणे गरजेचे आहे आणि ते ग्रंथ स्वरुपात असल्यास ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल आणि आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान आपण बाळगायला हवा .

रमेश बैस, राज्यपाल

बैस यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल डॉ. मोनिका ठक्कर यांचे विशेष कौतुक केले. 

Related posts

“आधी खडक फोडुनी तळी बांधावी”, छत्रपती शिवाजी महाराजांचे अज्ञापत्र

सरकारचे सांस्कृतिक धोरण अस्थिर – संमेलनाध्यक्ष कवी अजय कांडर

उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!