📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 14, 2026
काय चाललयं अवतीभवती

लातूरच्या डॉ. आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Dr Ambedkar Sahitya Academy of Latur appeals to send literature for awards

लातूर : प्रति वर्षाप्रमाणे यंदाही येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्काराचे आयोजन केले असून अकॅडमीचे हे 17 वे वर्ष आहे. मराठी भाषेतील, कथा, कविता, कादंबरी, संपादीत ग्रंथ, बालसाहित्य, आत्मचरित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरील ग्रंथ या पुरस्कार योजनेसाठी मागविण्यात येतात, अशी माहिती अकादमीचे सचिव प्रकाश घादगिने यांनी दिली आहे.

या पुरस्कार योजनेसाठी आपले साहित्य 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशीत झालेली असावी. आपले साहित्य दोन प्रतीत, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, संक्षिप्त परिचयासह 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अकॅदमीचे पाठवावी.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येक विभागात प्रथम क्रमांकास 1500 रुपये, व्दितीय 1000 रुपये तर तृतीय क्रमांकास 750 रुपये रोख, शाल श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन व्यक्तीचा गौरवही करण्यात येणार आहे.

तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त साहित्यिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अकॅदमीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. श्रीधर गायकवाड, सचिव प्रकाश घादगिने, प्रा. डॉ. माधव गादेकर, आर. पी. गायकवाड, गोंडराज रावन आत्राम, अर्जुन कांबळे, शिवाजी गायकवाड, डॉ. संजय जमदाडे, अँड अंगद गायकवाड, कुसुमताई बोडके, वंदना गादेकर आदींनी केले आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
सचिव प्रकाश घादगिने,
राजलक्ष्मी निवारा, गगन विहार जवळ, विशाल नगर,
लातूर – 413512. मो. नं. 9421695454

Related posts

एनएफडीसीच्या प्रमुख जागतिक चित्रपट बाजारचे 19 व्या पर्वाचे 20-24 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजन

इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार छायाचित्रकार संदेश भंडारे यांना जाहीर

सोलापूर येथील निर्मला मठपती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406