📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 29, 2026
काय चाललयं अवतीभवती

इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार छायाचित्रकार संदेश भंडारे यांना जाहीर

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संदेश भंडारे यांना तमाशा, वारी व आदिवासी प्रश्नांवरील योगदानाबद्दल इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार जाहीर.

कणकवली, जि. सिंधुदुर्गसमाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार, पत्रकार आणि लेखक संदेश भंडारे यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारामध्ये १० हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असा समावेश आहे. निवड समितीत राजन गवस, नितीन रिंढे व रणधीर शिंदे यांचा सहभाग होता. यापूर्वी या पुरस्काराने उल्का महाजन, कॉ. सुबोध मोरे, चंद्रकांत वानखडे व अतुल पेठे यांचा गौरव झाला आहे.

संदेश भंडारे हे गेली ३५ वर्ष छायाचित्रण, लेखन, संशोधन आणि डॉक्युमेंट्री फिल्म क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. तमाशा आणि वारी या महाराष्ट्राच्या दोन महान परंपरा त्यांच्या छायाचित्रणातून दस्तऐवजीकरण होऊन जतन व संवर्धन झाल्या. त्यांच्या “तमाशा – एक रांगडी गंमत”, “वारी – एक आनंदयात्रा” आणि “असाही एक महाराष्ट्र” या पुस्तकांना मोठी दाद मिळाली आहे. “देवळी–कोनाडा” ही त्यांची छायाचित्रमालिका जागतिक कीर्तीचे रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांच्या खाजगी संग्रहात स्थान मिळवते.

भंडारे यांनी महाश्वेता देवी यांच्या कथेवर आधारित ‘म्हादू’ या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून आदिवासी वंचित समूहाचे प्रश्न त्यांनी प्रभावीपणे मांडले. त्यांच्या छायाचित्र प्रदर्शनांचे कोची, दिल्ली, लंडन, पॅरिस, हॉलंडसह जगभरात आयोजन झाले असून मराठी संस्कृतीचे मान उंचावण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला आहे.

भटक्या (DNT) समाजाच्या प्रश्नांवर ते सध्या “स्वातंत्र्याचा शोध” या विषयावर कार्यरत असून, तमाशा आणि वारी परंपरेचे छायाचित्र संग्रहालय ‘आत्मभान’ चिंचणी, पंढरपूर येथे उभारले जात आहे.

संदेश भंडारे यांना यापूर्वी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार (२००८), महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार (२००७), इंद्रधनू पुरस्कार (२००३) आणि ऑल इंडिया आर्ट अँड क्राफ्ट पुरस्कार (१९९५) यांसारखे अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या बहुमोल योगदानाची दखल घेतच यंदाचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, सर्व स्तरांतून त्यांच्या कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

Related posts

अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणाऱ्या कविता

‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर

त्रैमासिक वारुळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!