May 3, 2026
Indian Vidya Bhavan to Launch Marathi Medium School in Pune
Home » पुणे येथील भारतीय विद्या भवन सुरू करणार मराठी माध्यमाची शाळा !
काय चाललयं अवतीभवती

पुणे येथील भारतीय विद्या भवन सुरू करणार मराठी माध्यमाची शाळा !

येत्या जून पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदर्श स्वरूपाची मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील भारतीय विद्या भवन या नामवंत शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेने येत्या जून पासून अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त, नवीन शैक्षणिक धोरणानुसार आदर्श स्वरूपाची मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे केंद्राचे संचालक व मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

पूर्व प्राथमिक ची मराठी शाळा खेळ गट म्हणजे नर्सरी व बालवाडी छोटा गट म्हणजे ज्युनिअर केजी सुरू केली जात आहे. येत्या जून पासून पूर्व प्राथमिक शाळेचे खेळ गट ( नर्सरी) व बालवाडी (ज्युनिअर केजी) हे वर्ग दुपारच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जागेची उपलब्धता लक्षात घेऊन प्रारंभी केवळ एक वर्ग सुरू करणार असून त्यामध्ये कमाल तीस पटसंख्या राहील असे ठरवण्यात आले आहे. हे विद्यार्थी दोन वर्षानंतर पहिली इयत्तेमध्ये जातील. त्यावेळी सक्तीच्या मोफत कायद्यातील तरतुदीनुसार (आरटीई ) प्रवेशांसाठी आवश्यक जागांवरील प्रवेश नियमानुसार केले जातील.

भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राची स्थापना १९८३ मध्ये पुण्यात झाली. शिवाजीनगर येथे छाब्रिया नर्सरी स्कूल व सुलोचना नातू विद्या मंदिर या दोन इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. गेली तीन दशके या शाळांचा कारभार सुरू असून मोफत सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसारही 25 टक्के प्रवेश इंग्रजी शाळेमध्ये गेली नऊ वर्षे देण्यात आलेले आहेत. या दोन्ही शाळा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर, मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि मराठी भाषा वृद्धिंगत व समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. काकिर्डे यांनी कळवले आहे.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

सुरक्षित बांधकामाची गुरुकिल्ली

त्रैमासिक वारूळ तर्फे साहित्य पुरस्कार जाहीर

कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!