fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 16, 2026
Home » कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर भात रोपवाटिकेची अशी घ्या विशेष काळजी .. Agricultural advice in the face of low rainfall
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर भात रोपवाटिकेची अशी घ्या विशेष काळजी .. Agricultural advice in the face of low rainfall

KVK Kirlos, Sindhudurg advises farmers to protect rice nurseries through timely weed control, moisture conservation and protective irrigation amid low rainfall conditions.
मध्यम मुदतीच्या हवामान अंदाजानुसार पुढील काही दिवस हलक्या पावसाची शक्यता असली तरी कमी पावसामुळे भात रोपवाटिकेच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे १५ ते ३० दिवसांच्या महत्त्वाच्या कालावधीत तण नियंत्रण, गिरीपुष्पाच्या पाल्याद्वारे आच्छादन आणि आवश्यकतेनुसार संरक्षणात्मक सिंचन करून रोपवाटिका निरोगी व जोमदार ठेवण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस, सिंधुदुर्ग🌾

भात रोपवाटिकेची घ्यावयाची काळजी

मध्यम मुदतीच्या जिल्हास्तरीय हवामान अंदाजानुसार दि. 13 ते 17 जून या कालावधीत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच उगवून स्थिर झालेल्या भात रोपवाटिकेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

तण नियंत्रणावर भर द्या

भात रोपवाटिकेमध्ये 15 ते 30 दिवसांचा कालावधी हा तण-पिक स्पर्धेचा महत्त्वाचा काळ असतो. या कालावधीत तणांचे नियंत्रण न केल्यास मृदेतील उपलब्ध ओलावा व अन्नद्रव्ये तणांकडून शोषली जातात. परिणामी रोपांची वाढ खुंटून रोपवाटिका निकृष्ट होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळेवर तण काढून रोपवाटिका तणमुक्त ठेवावी.

ओलावा संवर्धन करा

गादीवाफ्यावर तयार केलेल्या रोपवाटिकेमध्ये मोकळ्या जागी गिरीपुष्पाच्या पाल्याचे आच्छादन (Mulching) करावे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

संरक्षणात्मक सिंचन द्या

कमी पावसामुळे रोपांची वाढ मंदावत असल्यास आणि पाण्याची उपलब्धता असल्यास रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन द्यावे. यामुळे रोपांची वाढ चांगली होऊन निरोगी रोपे तयार होतात.

🌱तण नियंत्रण, ओलावा संवर्धन आणि वेळेवर सिंचन यामुळे भात रोपवाटिका निरोगी व जोमदार राहते.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
9423300762 / 9422449018
कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस, सिंधुदुर्ग

Related posts

रोहयो फळबागप्रमाणे वनौषधी लागवडीची हवी योजना

हिरव्यागार डोंगरांनी नटलेला फोंडा घाट…

नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!