📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 17, 2026
काय चाललयं अवतीभवती

‘ अक्षरसागर ‘ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

Gargoti aksharsagar-state-level-award-decleared

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ) येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने 2020 मधील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधून हे साहित्य पुरस्कार मंचाचे अध्यक्ष राजन कोनवडेकर व उपाध्यक्ष डाॅ. अर्जुन कुंभार यांनी आज जाहीर केले. या पुरस्कारांचे वितरण अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने १४ मार्च रोजी घेण्यात येणाऱ्या पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे.

शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020 पुरस्काराने सन्मानित करणेत येणार अशीही माहिती मंचाच्या वतीने देण्यात आली. जाहीर करण्यात आलेले पुरस्कार असे –

उत्कृष्ट साहित्य पुरस्कार

1) संतोष जगताप (लोणविरे) – वीजेने चोरलेले दिवस (कादंबरी)
2) रुस्तम होनाळे (नांदुरा) – वऱ्हाडातली बिऱ्हाडं (कथासंग्रह)
3) देवा झिंजाड (गारखिंडी, नगर) – सगळं उलथवून टाकलं पाहिजे (कवितासंग्रह)
4) नामदेव चव्हाण (सोलापूर) – लदनी (आत्मकथन)
5) शिरीष देशमुख (मंगरूळ,जालना) – बारीक सारीक गोष्टी (बालकथा)

विशेष पुरस्कार असे –

6) श्रीराम पचिंद्रे – मृगजळ मागे पाणी
7) गुरुबाळ माळी – कोरोना अनलाॅक
8) डाॅ. चंद्रकांत पोतदार – सृजनगंध
9) शौकत नदाफ – आनंदचक्र
10) सुनील देसाई – सप्तपर्व
11) डाॅ. शिवाजी काळे – गावकुसातल्या गोष्टी
12) सुरेश सायत्री किसन धनवे – अस्वस्थ मनाचे बंड
13) प्रदीप देशमुख – गर गर भोवरा
14) सुभाषचंद्र जाधव – शहेनशहा ए मूसीकार नौशाद
15) व्ही.डी.पाटील – रमे तेथे मन
16) डाॅ. सतिशकुमार पाटील – A D H D एक भावविश्व
17) गोपाळ आवटी – सृजन संवाद
18) विजय वडवेराव – इजु
19) अमर मुसळे – अमरवेल

Related posts

वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांना काव्य पुरस्कार

दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती – श्रीराम पेंडसे

मैत्र साहित्य पुरस्कार कवयित्री संध्या तांबे यांना जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406